शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले...

By admin | Updated: July 29, 2016 02:43 IST

आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत

- राजेश जाधव,  कल्याणआधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत असलेले रवींद्र गायकवाड यांचे कुटुंब बेघर झाले आहे. दुर्घटनेनंतर आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी लंबीचौडी आश्वासने दिली. आता कुणीही दखल घेत नसल्याने गायकवाड यांची अवस्था ‘लोक भेटायास आले काढत्या पायांसवे, अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले’, अशी झाली आहे.गायकवाड सांगतात की, तीन दिवस आजूबाजूच्या लोकांनी आसरा दिला. मात्र, आता त्यांनी हात वर केले. पत्नी सुजाता, वयोवृद्ध आई, लग्नाची मुलगी रोहिणी आणि राकेश व रितेश ही दोन मुले यांना घेऊन कुठं जाऊ, कुठं राहू, असा प्रश्न पडला आहे. स्फोटानंतर बांधकाम पाडून साफ केलेल्या मोकळ्या जमिनीच्या तुकड्याकडे गायकवाड दिवसभर पाहत बसलेले असतात. गायकवाड यांच्यासारखीच स्थिती शेजारील आवारे व धनगर कुटुंबांची झाली आहे.गायकवाड गेला महिनाभर आजारी आहेत. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता सिलिंडर स्फोटानंतर मुलगी जोरजोरात ओरडू लागली की, बाबा आपलं घर कोसळतंय. आयुष्यभराची कमाई खर्च करून बांधलेलं घर पडतंय, या कल्पनेनं पायाखालची जमीन सरकली. घराच्या खचलेल्या भिंती पाहून मनानं खचलो होतो. तेवढ्यात, शेजारच्या घरातील ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांच्या किंकाळ््या ऐकून त्यांना वाचवायला धावलो. महापौर राजेंद्र देवळेकर भेटायला आले तेव्हा मी त्यांना माझी व्यथा सांगितली. ते म्हणाले की, काही काळजी करू नकोस. मात्र, अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही की, आसरा घेण्याची पर्यायी व्यवस्था झाली नाही. आमच्या अंगावर धड कपडे नाहीत. आई नेसलेल्या लुगड्यानिशी तीन दिवस वावरत आहे. मुलीला कुणीतरी ड्रेस बदलायला दिला. मला शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शाल पांघरायला दिली. गेले तीन दिवस तीच अंगाभोवती गुंडाळून फिरतोय, असं गायकवाड यांनी सांगितलं. गायकवाड यांची पत्नी सुजाता म्हणाल्या की, स्थानिक आमदार, नगरसेवक कुणीही आमची विचारपूस करायला फिरकले नाहीत. श्रीमंतांचा एखादा टॉवर कोसळला असता तर त्यांचे अश्रू पुसायला हे सारे धावत आले असते. दोन वेळा काय खायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुले शिक्षण घेताहेत, मुलीचं लग्न करायचंय, असा प्रश्न आहे. पण मदतीसाठी कोणाचेही हात आमच्याकडे आलेले नाहीत.