शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे ...

कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, याकडे उल्हास नदी बचाव समितीने लक्ष वेधले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत. पाणी आणि स्वच्छता मिशनची ही दुसरी बैठक होती. जलजीवन मिशन हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी उद्दिष्ट आखून दिले आहे. कोरोनाची साथ आणि पावसाळा यामुळे उद्दिष्टपूर्तीस विलंब होत आहे. या बैठकीच्या धर्तीवर उल्हास नदी बचाव समितीने कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. या गावांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावा

विशेष म्हणजे उल्हास नदी बारमाही जलस्त्रोत आहे. या नदीतून अनेक लोक पाणी उचलतात. मात्र, या नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. तेच पाणी प्रक्रियेविना संबंधित गावपाड्यांतील रहिवासी पीत आहेत. या ठिकाणी एक जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, तो पूर्णत्वास आलेला नाही. त्याचे काम लवकर मार्गी लावावे, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. समिती गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

---------------------