शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे ...

कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, याकडे उल्हास नदी बचाव समितीने लक्ष वेधले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत. पाणी आणि स्वच्छता मिशनची ही दुसरी बैठक होती. जलजीवन मिशन हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी उद्दिष्ट आखून दिले आहे. कोरोनाची साथ आणि पावसाळा यामुळे उद्दिष्टपूर्तीस विलंब होत आहे. या बैठकीच्या धर्तीवर उल्हास नदी बचाव समितीने कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. या गावांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावा

विशेष म्हणजे उल्हास नदी बारमाही जलस्त्रोत आहे. या नदीतून अनेक लोक पाणी उचलतात. मात्र, या नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. तेच पाणी प्रक्रियेविना संबंधित गावपाड्यांतील रहिवासी पीत आहेत. या ठिकाणी एक जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, तो पूर्णत्वास आलेला नाही. त्याचे काम लवकर मार्गी लावावे, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. समिती गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

---------------------