शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

‘क्लस्टर’द्वारे अनधिकृत दिवाही होणार आता अधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:41 IST

प्रमोद पाटील यांची लगीनघाई । महापालिका आयुक्तांची घेतली भेट, आठ दिवसांत सर्वेक्षण करण्याचे दिले आदेश

ठाणे : अनधिकृत बांधकामांसाठी कुख्यात असलेले आणि याच बांधकामांमुळे पावसाळ्यात तुंबलेल्या दिवावासीयांना अद्यापही पावसाळ्यातील नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसा प्रयत्न वा त्यासाठी पाठपुरावा करण्यात ठाण्यातील एकाही नेत्याने स्वारस्य दाखविलेले नाही. मात्र,आता बिल्डर आणि राजकिय नेत्यांना विशेष रस असलेली मलईदार क्लस्टर योजना दिव्यातही राबविण्यात येणार आहे. यामुळे अनधिकृत असलेले दिवा एकीकडे अधिकृत होण्यास मदत होणार असून दुसरीकडे प्रशासन,बिल्डरांसह राजकिय पुढाऱ्यांचेही चांगभले होणार आहे.कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन दिव्यात क्लस्टर योजना राबवण्याची मागणी केली.दिव्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने क्लस्टर राबवल्यास दिव्यातील नागरिकांना अधिकृत घरे मिळून मालमत्ताकराच्या माध्यमातून पालिकेचे उत्पन्नदेखील वाढणार असल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. येथील बराचसा भाग हा सीआरझेडमध्ये असल्याने येत्या ८ दिवसांत सर्व्हे करून कोणत्या भागात क्लस्टर व्यवहार्य होऊ शकते, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.गुरुवारी ठाण्यातील किसननगर भागात क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर, घाणेकर नाट्यगृहात एमएमआरए रिजनमध्येही क्लस्टर राबविण्याबरोबरच त्याचे वेगळे प्राधिकरण करण्याचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार, पाटील यांनी ही मागणी केली. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ४४ यूआरपीमध्ये दिव्याच्या क्लस्टरचा समावेश असला, तरी सुरुवातीला केवळ पालकमंत्र्यांच्या भागातील क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतरच आता दिव्याच्या क्लस्टर योजनेच्या हालचालींना वेग आला आहे.त्रस्त रहिवाशांची होणार सोय : पावसाळ्यात दिव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यासाठी येथील त्रस्त रहिवाशांना सुरक्षित निवारा देण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरी सुविधांची वानवा असून क्लस्टर योजना राबवल्यास दिवा भागासाठी नागरी सुविधादेखील मुबलक प्रमाणात मिळतील.विशेष म्हणजे मालमत्ताकर भरण्यामध्ये दिवा सर्र्वात पिछाडीवर असल्याने क्लस्टरच्या माध्यमातून दिव्यात मोठ्या प्रमाणात घरे निर्माण झाल्यास या कराच्या माध्यमातून पालिकेच्या उत्पनातदेखील भर पडणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.दिवा यूआरपी २०१ हेक्टरचा : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या ४४ यूआरपीमधील दिवा हे सर्वात मोठे यूआरपी असून २०१ हेक्टर परिसर यूआरपीमध्ये येतो. मात्र, मोठ्या प्रमाणात सीआरझेडचा परिसर असल्याने विकासासाठी केवळ १४ टक्के क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वात मोठी क्लस्टर योजना असूनही ती किती व्यवहार्य आहे, हे सर्व्हेनंतरच स्पष्ट होईल.