शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

बेकायदा बांधकामे, ७६ विकासकांविरूद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:00 IST

२७ गावांमध्ये अनधिकृत इमारती; बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा आरोप

डोंबिवली : २७ गावांमध्ये जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरणाच्या काळात जिल्हा परिषदेच्या विविध परवानग्या न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे येथील सरकार, ग्राहक आणि वित्तीय संस्थांची फसवणूक करणाऱ्या ७६ विकासकांविरोधात ठाणे जिल्हा परिषदेच्या सहाय्यक गटविकास अधिकारी कृपाली बांगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.ठाणे जिल्ह्यातील २७ गावे केडीएमसीमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी २००३ ते २००६ पर्यंत त्यांचे नियोजन प्राधिकरण हे संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीकडे होते. त्यानंतर या गावांच्या नियोजित विकासासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे जिल्हा परिषदेला नियुक्त करण्यात आले होते. या गावांतील नागरीकरण आणि लोकसंख्येचा विचार करता या भागाचा जलद आणि नियोजित विकास होण्यासाठी या गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर ही गावे २०१५ पासून केडीएमसीमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहेत. २७ गावांतील बांधकामांना जानेवारी ते सप्टेंबर २००६ या कालावधीत परवानगी देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्राधिकरणांची होती. पण, या गावांतील काही मूळ जमीनमालक आणि विकासकांनी त्यांच्याकडील जमिनींवर बांधकाम करताना सक्षम प्राधिकरणांकडून कोणत्याही प्रकारे बांधकामासंबंधित परवानगी न घेता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृत इमारती बांधून त्या अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बनावट शिक्क्यांचा, तसेच अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षºया करून बनावट बांधकाम परवानग्या तयार केल्या आहेत. याबाबतचे बरेच अर्ज जिल्हा परिषदेकडे नागरिकांसह दुय्यम निबंधक कार्यालय आणि वित्तीय संस्थांकडून प्राप्त झाले होते. या अर्जांची पाहणी केली असता, जिल्हा परिषदेकडून देण्यात न आलेल्या ३२ प्रकरणांत बनावट परवानग्या आढळून आल्या. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रकरणांत ३५ बोगस बांधकाम परवानग्या आढळून आल्या होत्या.सर्व बोगस बांधकामांची यादी तयार करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पोलीस आयुक्तांना कळवले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी ७६ विकासकांविरोधात जिल्हा परिषदेने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.