शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

उंबर्डे, बारावे प्रकल्पाची आज जनसुनावणी, नागरिकांचा घनकचरा प्रक्रियेला विरोध असल्याने लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका उंबर्डे व बारावे येथे उभारत असलेल्या शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका उंबर्डे व बारावे येथे उभारत असलेल्या शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवार) ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कल्याणच्या अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये जनसुनावणी आयोजित केली आहे. ही जनसुनावणी घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने जिल्हाधिकाºयांना दिले होते.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या उभारणीत दिरंगाई केली जात असल्याने उच्च न्यायालयात कौस्तुभ गोखले यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने हरीत लवादाकडे वर्ग केली. महापालिकेने आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी २९ कोटी ५३ लाख रुपयांची निविदा मागवली आहे. त्याचे कार्यादेश कंत्राटदार कंपनीला दिले आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेने उंबर्डे व बारावे येथे शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी व घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविली होती. उंबर्डेसाठी १९ कोटी ६६ लाख रुपये तर बारावेसाठी ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाची निविदा मागवून कंत्राटदाराला ते काम करण्याचे कार्यादेश दिले आहेत. उंबर्डे येथे घनकचºयाचे वर्गीकरण करण्यात येणार असून तेथे ओल्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खत निर्मिती केली जाणार आहे. प्लॅस्टीक कचºयावर प्रक्रिया करुन त्यापासून उर्जा तयार केली जाणार. ‘वेस्ट टु कंम्पोज’ आणि ‘वेस्ट टु एनर्जी’ अशा दोन प्रकारे प्रक्रिया केली जाणार आहे.प्रकल्प सुरु करण्यापूर्वी पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला घेणे अपेक्षित होते. तो न घेताच प्रस्ताव तयार केला गेला आहे. त्याला याचिकाकर्त्यांनी हरकत घेतली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनी याकरिता महापालिकेच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. प्रकल्प आणि रहिवासी यांच्यामध्ये बफर झोन असणे अपेक्षित आहे. मात्र त्याठिकाणी बफर झोन नसल्याचे निदर्शनास आले आहे. आधारवाडी डंपींग ग्राऊंडचा नागरीकांना त्रास होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने ते बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र अद्याप आधारवाडी बंद करण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. आधारवाडीपासून धडा न घेता महापालिकेने उंबर्डे व बारावेचा प्रकल्प हाती घेतला. उंबर्डे व बारावे याठिकाणी प्रकल्पास स्थानिक नागरीकांचा प्रखर विरोध आहे. बारावे परिसरातील नागरीकांनी प्रकल्पाला विरोधात महापालिकेवर मोर्चा काढला होता. यापूर्वीच्या कंत्राटदाराने प्रकल्पास विरोध झाल्याने ४८ लाख रुपयांच्या अनामत रक्कमेवर पाणी सोडून पळ काढला होता. नव्या कंत्राटदारालाही विरोध होत आहे. प्रकल्प सुरु करायचा असल्यास पोलीस बंदोबस्तात करावे लागले, अशी स्थिती आहे.