शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

उंबर्डे घनकचरा प्रकल्प पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या २०० एकर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे; तसेच कचऱ्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उंबर्डे घनकचरा प्रकल्प हा नदी व खाडी किनाऱ्यापासून जवळ आहे. अतिवृष्टीमुळे खाडी व नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी उंबर्डे गावात शिरले आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प पाण्याखाली गेला आहे. प्रकल्पातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात तसेच शेतात पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिक व शेतकरी बबन कारभारी म्हणाले की, सरकारच्या पर्यावरण नियमानुसार पाणथळ जागेजवळ कचरा प्रकल्प नसावा. या प्रकल्पास स्थानिकांचा सुरुवातीपासून विरोध आहे; मात्र केडीएमसीने हा विरोध न जुमानता प्रकल्प उभारला. त्याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया कमी आणि कचरा साठवून ठेवण्याचे काम जास्त होत आहे. पावसामुळे या प्रकल्पाची पोलखोल झाली आहे. शहरातील अन्य ठिकाणी प्रकल्प राबविण्याऐवजी उंबर्डेत तो राबविण्याचे कारण काय? उंबर्डेत नागरिक राहत नसून जनावरे राहतात का? प्रकल्प बंदिस्त करण्याची आमची मागणी होती; मात्र तीही मनपाने पूर्ण केलेली नाही. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एकतर हा प्रकल्प बंद करावा, अन्यथा आम्हाला विष देऊन मारून टाकावे, याकडे कारभारी व चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले आहे.

बारावे घनकचरा प्रकल्पासही अतिवृष्टीचा फटका

बारावे घनकचरा प्रकल्पासही स्थानिक नागरिकांचा विरोध होता; मात्र तो न जुमानता प्रकल्प राबविला आहे. हा प्रकल्पही नदी किनाऱ्यापासून जवळच आहे. अतिवृष्टीमुळे गुरुवारी या प्रकल्पात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि विरोध योग्यच होता, हे अतिवृष्टीमुळे उघड झाले आहे, याकडे स्थानिक सुनील घेगडे यांनी लक्ष वेधले आहे.

----------------------