शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

उंबर्डे घनकचरा प्रकल्प पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या २०० एकर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे; तसेच कचऱ्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उंबर्डे घनकचरा प्रकल्प हा नदी व खाडी किनाऱ्यापासून जवळ आहे. अतिवृष्टीमुळे खाडी व नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी उंबर्डे गावात शिरले आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प पाण्याखाली गेला आहे. प्रकल्पातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात तसेच शेतात पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिक व शेतकरी बबन कारभारी म्हणाले की, सरकारच्या पर्यावरण नियमानुसार पाणथळ जागेजवळ कचरा प्रकल्प नसावा. या प्रकल्पास स्थानिकांचा सुरुवातीपासून विरोध आहे; मात्र केडीएमसीने हा विरोध न जुमानता प्रकल्प उभारला. त्याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया कमी आणि कचरा साठवून ठेवण्याचे काम जास्त होत आहे. पावसामुळे या प्रकल्पाची पोलखोल झाली आहे. शहरातील अन्य ठिकाणी प्रकल्प राबविण्याऐवजी उंबर्डेत तो राबविण्याचे कारण काय? उंबर्डेत नागरिक राहत नसून जनावरे राहतात का? प्रकल्प बंदिस्त करण्याची आमची मागणी होती; मात्र तीही मनपाने पूर्ण केलेली नाही. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एकतर हा प्रकल्प बंद करावा, अन्यथा आम्हाला विष देऊन मारून टाकावे, याकडे कारभारी व चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले आहे.

बारावे घनकचरा प्रकल्पासही अतिवृष्टीचा फटका

बारावे घनकचरा प्रकल्पासही स्थानिक नागरिकांचा विरोध होता; मात्र तो न जुमानता प्रकल्प राबविला आहे. हा प्रकल्पही नदी किनाऱ्यापासून जवळच आहे. अतिवृष्टीमुळे गुरुवारी या प्रकल्पात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि विरोध योग्यच होता, हे अतिवृष्टीमुळे उघड झाले आहे, याकडे स्थानिक सुनील घेगडे यांनी लक्ष वेधले आहे.

----------------------