शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

उंबर्डे घनकचरा प्रकल्प पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या २०० एकर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे; तसेच कचऱ्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उंबर्डे घनकचरा प्रकल्प हा नदी व खाडी किनाऱ्यापासून जवळ आहे. अतिवृष्टीमुळे खाडी व नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी उंबर्डे गावात शिरले आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प पाण्याखाली गेला आहे. प्रकल्पातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात तसेच शेतात पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिक व शेतकरी बबन कारभारी म्हणाले की, सरकारच्या पर्यावरण नियमानुसार पाणथळ जागेजवळ कचरा प्रकल्प नसावा. या प्रकल्पास स्थानिकांचा सुरुवातीपासून विरोध आहे; मात्र केडीएमसीने हा विरोध न जुमानता प्रकल्प उभारला. त्याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया कमी आणि कचरा साठवून ठेवण्याचे काम जास्त होत आहे. पावसामुळे या प्रकल्पाची पोलखोल झाली आहे. शहरातील अन्य ठिकाणी प्रकल्प राबविण्याऐवजी उंबर्डेत तो राबविण्याचे कारण काय? उंबर्डेत नागरिक राहत नसून जनावरे राहतात का? प्रकल्प बंदिस्त करण्याची आमची मागणी होती; मात्र तीही मनपाने पूर्ण केलेली नाही. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एकतर हा प्रकल्प बंद करावा, अन्यथा आम्हाला विष देऊन मारून टाकावे, याकडे कारभारी व चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले आहे.

बारावे घनकचरा प्रकल्पासही अतिवृष्टीचा फटका

बारावे घनकचरा प्रकल्पासही स्थानिक नागरिकांचा विरोध होता; मात्र तो न जुमानता प्रकल्प राबविला आहे. हा प्रकल्पही नदी किनाऱ्यापासून जवळच आहे. अतिवृष्टीमुळे गुरुवारी या प्रकल्पात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि विरोध योग्यच होता, हे अतिवृष्टीमुळे उघड झाले आहे, याकडे स्थानिक सुनील घेगडे यांनी लक्ष वेधले आहे.

----------------------