शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे नाक मुठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच, प्रकल्पातील कचऱ्यावर घाेंगावणाऱ्या माशा घरात ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच, प्रकल्पातील कचऱ्यावर घाेंगावणाऱ्या माशा घरात शिरत असल्याने आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी साेमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेऊन केडीएमसीच्या कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यास जाब विचारला. नागरिकांचा त्रास कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केले आहे. आता महापालिका हद्दीतून गोळा होणारा कचरा हा उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जात आहे. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याने त्या परिसरातील नागरिकांची कचऱ्याच्या त्रासातून सुटका झाली. उंबर्डे येथील हा प्रकल्प बंदिस्त असणे गरजेचे हाेते, मात्र तो उघड्यावर असल्याने नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी १७ गाड्याच येणे अपेक्षित आहे. मात्र, तेथे त्यापेक्षा जास्त गाड्या येतात. येथे येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. याकडे स्थानिक नागरिक चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले. अखेर संतप्त नागरिकांनी लोखंडे यांच्या पुढाकाराने साेमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेतली. तेथे पोलीसही पोहाेचले होते. कचरा प्रकल्पाच्या कंत्राटदाराचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यास संतप्त नागरिकांनी जाब विचारला. तसेच हा प्रकल्प बंद केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

दुसऱ्या डम्पिंग ग्राउंडची तयारी?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनीही आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महापालिका हद्दीतील सगळाच कचरा उंबर्डे येथे टाकला जाऊ नये. केवळ ब आणि क प्रभागातील कचऱ्यावर प्रक्रिया करू शकता. मात्र सर्वच कचरा येथे टाकून आधारवाडीनंतर दुसरे डम्पिंग ग्राउंड उंबर्डे येथे तयार करायचे आहे का, असा संतप्त सवालही भोईर यांनी उपस्थित केला होता.

-----------------