शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे नाक मुठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच, प्रकल्पातील कचऱ्यावर घाेंगावणाऱ्या माशा घरात ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच, प्रकल्पातील कचऱ्यावर घाेंगावणाऱ्या माशा घरात शिरत असल्याने आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी साेमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेऊन केडीएमसीच्या कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यास जाब विचारला. नागरिकांचा त्रास कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केले आहे. आता महापालिका हद्दीतून गोळा होणारा कचरा हा उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जात आहे. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याने त्या परिसरातील नागरिकांची कचऱ्याच्या त्रासातून सुटका झाली. उंबर्डे येथील हा प्रकल्प बंदिस्त असणे गरजेचे हाेते, मात्र तो उघड्यावर असल्याने नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी १७ गाड्याच येणे अपेक्षित आहे. मात्र, तेथे त्यापेक्षा जास्त गाड्या येतात. येथे येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. याकडे स्थानिक नागरिक चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले. अखेर संतप्त नागरिकांनी लोखंडे यांच्या पुढाकाराने साेमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेतली. तेथे पोलीसही पोहाेचले होते. कचरा प्रकल्पाच्या कंत्राटदाराचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यास संतप्त नागरिकांनी जाब विचारला. तसेच हा प्रकल्प बंद केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

दुसऱ्या डम्पिंग ग्राउंडची तयारी?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनीही आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महापालिका हद्दीतील सगळाच कचरा उंबर्डे येथे टाकला जाऊ नये. केवळ ब आणि क प्रभागातील कचऱ्यावर प्रक्रिया करू शकता. मात्र सर्वच कचरा येथे टाकून आधारवाडीनंतर दुसरे डम्पिंग ग्राउंड उंबर्डे येथे तयार करायचे आहे का, असा संतप्त सवालही भोईर यांनी उपस्थित केला होता.

-----------------