शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

उंबर्डे घनकचरा प्रकल्पाची कोंडी; नगरसेवकाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:57 IST

दुसरीकडे नगरसेवक भोईर आणि सर्वपक्षीय उंबर्डे डम्पिंग ग्राउंडविरोधी कृती समितीनेही प्रकल्पास विरोध केला आहे. यापूर्वी जेव्हा विरोध झाला,

मुरलीधर भवार कल्याण : घनकचरा प्रकल्पांमुळे केडीएमसी अडचणीत आली आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेशिवाय आधारवाडी डम्पिंग कायमस्वरूपी बंद होऊ शकत नाही. उंबर्डे कचरा प्रकल्पाचे काम सुरू होऊनही महापालिकेने कंत्राटदार कंपनीला ८० लाखांचे बिल अद्याप दिलेले नाही. तर, दुसरीकडे प्रकल्पाच्या कामास स्थानिक शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी पुन्हा विरोध केल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आहे.

महापालिका कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. प्रकल्प राबवण्यास चालढकल केल्याप्रकरणी महापालिका हद्दीत २०१५ मध्ये नव्या इमारतींच्या बांधकाम मंजुरीवर न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर, २०१६ मध्ये महापालिकेने कचरा प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या, जागेचा प्रश्न, निविदा काढणे, या प्रक्रियेत वेळ वाया गेला आहे.

महापालिकेने उंबर्डे, बारावे आणि मांडा येथे प्रकल्प राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. सौराष्ट्र कंपनीला प्रकल्प राबवण्याचे कंत्राट दिलेले आहे. उंबर्डेतील घनकचरा प्रकल्पाचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. मात्र, महापालिकेने कंत्राटदारास बिल दिलेले नाही. त्यामुळे पुढील काम कसे करायचे, असा प्रश्न कंपनीसमोर आहे.

दुसरीकडे नगरसेवक भोईर आणि सर्वपक्षीय उंबर्डे डम्पिंग ग्राउंडविरोधी कृती समितीनेही प्रकल्पास विरोध केला आहे. यापूर्वी जेव्हा विरोध झाला, तेव्हा महापालिकेने पोलीस बंदोबस्तात बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू केले होते. आता घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे. भोईर म्हणाले की, उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाबरोबरच बारावे व मांडा येथेही कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे. सध्या उंबर्डे येथेच प्रकल्पाचे काम सुरू आहे. अन्य ठिकाणीही प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तेथील काम सुरू झाल्यावर उंबर्डे येथील काम सुरू करावे. दरम्यान, या आशयाचे पत्रही कृती समितीनेही आयुक्तांना दिले आहे.

बारावेप्रकरणी १० जूनला सुनावणीबारावे घनकचरा प्रकल्पास बारावे हिल रोड सामाजिक संस्थेने विरोध केला आहे. या ठिकाणच्या एका जागरूक नागरिकाने हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. लवादाने हे प्रकरण राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे वर्ग केल्यावर सरकारने याप्रकरणी देवधर समिती नेमली. या समितीने यापूर्वी पाहणी केली आहे. समितीच्या अहवालप्रकरणी १० जूनला सुनावणी होणार आहे.

जनसुनावणीचा अहवाल तज्ज्ञ समितीसमोरमांडा येथे घनकचरा प्रकल्प करण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेतली होती. त्यावेळी नागरिकांनी प्रकल्पास तीव्र विरोध केला होता. जनसुनावणीचा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे सादर केला आहे. हा अहवाल राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीसमोर ठेवला आहे. समितीसमोर तो विचाराधीन आहे.