शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

By admin | Updated: April 12, 2017 03:42 IST

उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. उरलेल्या शहराला सध्या एक दिवसाआड पाणी मिळते आहे. एप्रिल महिना सुरू होताच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील किमान दोन महिने उल्हासनगरच्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीत काढावे लागतील, याची चुणूक यातून मिळाली आहे.सध्या उल्हासनगरची पाणीचोरी आणि गळती ४० टक्क्यांवर गेली आहे. या टंचाईविरोधात शिवसेनेने लगेचच उपोषणाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी केली आहे. एमआयडीसीकडून १२९ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणी मुरते कुठे, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी पालिकेला केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेच्या पहिल्या महासभेच्या दिवशी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला. अनेकदा आवाज उठवूनही परिस्थिती सुधारत नसल्याने उपोषण करावे लागल्याचे नगरसेवक अरूण अशान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर : लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई असल्याची माहिती आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. शहरात ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबविल्यावरही पाणीटंचाई कायम आहे. टंचाई असलेले परिसर : कॅम्प नंबर चारच्या परिसरातील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाडा, सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की आदी परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे.प्यायला तरी पाणी द्या! : महापालिकेने राबवलेली ३०० कोटींची पाणी वितरण योजना पूर्णत: फसली आहे. नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी द्या, अशी मागणी उपोषणाला बसलेले नगरसेवक अरूण अशान, शेखर यादव, सुनील सुर्वे, सोनु सान्पुर, माजी महापौर व नगरसेविका लीलाबाई आशान आदींनी केली आहे.