शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

By admin | Updated: April 12, 2017 03:42 IST

उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. उरलेल्या शहराला सध्या एक दिवसाआड पाणी मिळते आहे. एप्रिल महिना सुरू होताच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील किमान दोन महिने उल्हासनगरच्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीत काढावे लागतील, याची चुणूक यातून मिळाली आहे.सध्या उल्हासनगरची पाणीचोरी आणि गळती ४० टक्क्यांवर गेली आहे. या टंचाईविरोधात शिवसेनेने लगेचच उपोषणाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी केली आहे. एमआयडीसीकडून १२९ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणी मुरते कुठे, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी पालिकेला केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेच्या पहिल्या महासभेच्या दिवशी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला. अनेकदा आवाज उठवूनही परिस्थिती सुधारत नसल्याने उपोषण करावे लागल्याचे नगरसेवक अरूण अशान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर : लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई असल्याची माहिती आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. शहरात ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबविल्यावरही पाणीटंचाई कायम आहे. टंचाई असलेले परिसर : कॅम्प नंबर चारच्या परिसरातील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाडा, सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की आदी परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे.प्यायला तरी पाणी द्या! : महापालिकेने राबवलेली ३०० कोटींची पाणी वितरण योजना पूर्णत: फसली आहे. नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी द्या, अशी मागणी उपोषणाला बसलेले नगरसेवक अरूण अशान, शेखर यादव, सुनील सुर्वे, सोनु सान्पुर, माजी महापौर व नगरसेविका लीलाबाई आशान आदींनी केली आहे.