शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उल्हासनगर वालधुनी नदी किनारील भूखंड वाचला; महापालिका सतर्क अधिकाऱ्याचे होतेय कौतुक

By सदानंद नाईक | Updated: July 12, 2022 18:26 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेल्वे स्टेशन परिसरातून वाहणारी वालधुनी नदी किनारी २ ते ३ एकरचा खुला भूखंड असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू होते.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ रेल्वे स्टेशन परिसरातील वालधुनी नदी किनारील राज्य शासनाच्या भूखंडावर होत असलेले अवैध बांधकाम तहसील कार्यालयाकडून सील करण्यात आले. महापालिकेच्या सतर्क अधिकाऱ्यामुळे शासन भूखंड अतिक्रमण पासून वाचल्याचे बोलले असून प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेल्वे स्टेशन परिसरातून वाहणारी वालधुनी नदी किनारी २ ते ३ एकरचा खुला भूखंड असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू होते. सदर भूखंड राज्य शासनाच्या मालकीचा असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, अतिक्रमण प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग समिती क्रं-३ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी प्रांत अधिकारी कार्यालया सोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर प्रांत कार्यालयाने अवैध बांधकाम होत असेलतर महापालिकेने कारवाई करावी. असे पत्राद्वारे सुचविले. महापालिका व प्रांत कार्यालयात पत्र व्यवहार असताना तहसील कार्यालयाने या भूखंडावर राज्य शासनाची जागा असे नामफलक लावून पत्राच्या सरंक्षण भिंतीच्या दाराला सील केले. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर तहसीलदार कोमल ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. 

महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी यांच्या सतर्कतेमुळे तर प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांच्या सहकार्यामुळे नदी किनारील २ ते ३ एकरचा भूखंड वाचल्याचे बोलले जाते. वालधुनी नदी पात्रात अवैध बांधकाम झाल्याने, नदीचे पुराचे पाणी अडून झोपडपट्टीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदी किनारी बांधकाम होत असतांनाच, महापालिकेने त्वरित कारवाई करायला हवी. असेही बोलले जात आहे. मात्र प्रांत अधिकारी जयराज कारभारी व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या भूमिकेने भूखंडावरील बांधकाम बंद करून सील करावे लागले आहे. 

वालधुनी नदी किनाऱ्यावरील बांधकामे टार्गेटवर 

शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारी शेकडो अवैध बांधकामे उभे राहिले आहेत. या बांधकामामुळे पुराचे पाणी नदी किनारील घरात घुसण्याची शक्यता निर्माण झाल्याने, अश्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर