शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उल्हासनगर वाहतूक विभागाची वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनांवर कारवाई 

By सदानंद नाईक | Updated: December 24, 2023 19:02 IST

७ कोटी १४ लाखाचा केला दंड वसूल.

उल्हासनगर : शहरातील उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस विभागाने नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनावर कारवाई केली. तर त्यांच्याकडून ७ कोटी १३ हजार ९० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

उल्हासनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस विभाग कार्यान्वित आहे. विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असतांनाही कारवाई नेत्रदीपक आहे. उल्हासनगर वाहतूक उपविभागाने जानेवारी ते १४ डिसेंबर दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार एकून ५६ हजार ६१२ केसेस करून ४ कोटी ९८ लाख ३६ हजार ३०० रुवयाचा दंड वसूल केला. तर विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाने ४० हजार ५१० वाहनावर केसेस करून २ कोटी १५ लाख ५४ हजार १५० रुवयए दंड वसूल केला. दोन्ही विभागाकडून एकून ९७ हजार १२२ वाहनावर कारवाई करून एकून ७ कोटी १३ हजार ९० हजार ४५० रुपये दंड वसूल केला आहे. 

उल्हासनगर उपविभागीय वाहतूक विभागाने वर्षभरात ७ हजार ४४ रिक्षावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कागदपत्र नसणे, परमिट नसणे आदी कारणांनुसार कारवाई करून ५९ लाख ६३ हजार ९५० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच लोकअदालतच्या अनुषंगाने ई-चलन भरत नव्हते. अश्या १२५ वाहनाकडून ३ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूणच वाहतूक पोलिसांनी कामगिरीचे कौतुक होत असताना, शहराला वाहतूक कोंडीतून सुटका करणारी टोईंग गाडी व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे बंद आहे. विठ्ठलवाडी वाहतूक विभागाने मात्र व्यापाऱ्यांच्या विरोधानंतरही टोइंग गाडी सुरू करून बेशिस्त वाहनावर कारवाई करीत आहे. राजकीय पक्ष नेता, व्यापारी, नागरिक आदींनी वाहतूक विभागाला सहकार्य केल्यास, शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याचे संकेत वाहतूक पोलीस विभागाने दिले आहे.

वॉर्डनच्या पगारात वाढ करण्याची मागणी शहरात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पोलीस वाहतूक विभागाच्या दिमतीला ५० पेक्षा जास्त वॉर्डन दिले. वॉर्डनला दरमहा ६ हजार मानधन दिले जाते. मात्र देण्यात येणारे मानधन कमी असल्याने, शासन नियमानुसार वेतन देण्याची मागणी वाहतूक पोलीस विभागाने महापालिका आयुक्तांकडे केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर