शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

उल्हासनगरमध्ये अजूनही ३५० स्वयंसेवक मानधनाविना; जीव धोक्यात घालून केलं सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 23:46 IST

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे मानधन अद्याप दिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला असून महापालिकेचा आरोग्य विभाग व महापौर लीलाबाई अशान यांना श्रेय जाते. उपमहापौर भगवान भालेराव, सभागृह नेते भरत गंगोत्री, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण अशान, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे आदींच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात दिलेल्या स्वयंसेवकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तसेच संशयित कोरोना रुग्णांची नोंद करून वेळीच उपचार केले. त्यामुळेच कोरोना रुग्णांना ब्रेक लागल्याची प्रतिक्रिया डॉ. सपकाळे यांनी दिली.

शहरात ही मोहीम यशस्वीपणे राबविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवक दुर्लक्षित राहिल्याचा आरोप युवा सेनेचे रवी निकम यांनी केला आहे.  स्वयंसेवकांनी सलग २५ दिवस स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून काम केले. त्याबदल्यात त्यांना सरकारकडून दररोज १०० व महापालिका १०० असे एकूण २०० रुपये मानधन देण्याचे ठरले होते. सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

निकम यांनी मानधनासाठी शहरप्रमुख चौधरी व महापौरांकडे दाद मागितल्यावर मानधन देण्याचे आश्वासन मिळाले. काेराेनाच्या काळात शहरात रुग्णसंख्या वाढल्यामुळे पालिका प्रशासन चिंतेत पडले हाेते. मात्र, आयुक्त डाॅ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आराेग्य व्यवस्थेची सुधारणा करुन  रुग्णसंख्या कमी करण्यात अखेर पालिका प्रशासनाला यश आले. पालिकेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आवाहनाला शहरातील नागरिक, व्यापारी यांनी चांगला पाठिंबा दिल्यामुळे  रुग्णवाढीचा दर खाली आला. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास काेराेनाचा प्रार्दुभाव नक्कीच वाढणार नाही असा विश्वास पालिका प्रशासनाने या निमित्ताने व्यक्त केला आहे.

मानधन लवकरच मिळेल‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. सरकारकडून आलेल्या निधीतून त्यांना पहिल्या टप्प्याचे मानधन दिले. लवकरच पालिकेच्या वतीने देण्यात येणारे मानधन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या