शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

उल्हासनगरची विशेष समिती ओमी टीमला की शिवसेनेला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:45 IST

अंतर्गत वादाचा फटका : २ मे च्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

उल्हासनगर : महापालिका सत्तेतील भाजप-ओमी टिम व साई पक्षातील वादाचा फटका विशेष समिती निवडणुकीलाही बसला आहे. या समिती सदस्यांची निवड २ मेच्या महासभेत होणार असून त्यात भाजपा शिवसेनेला मदत करते की ओमी टीमला एक समिती देऊन पक्षातील नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यावर सारे राजकीय चित्र अवलंबून आहे.उल्हासनगर महापालिकेवर सध्या भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. मात्रअंतर्गत वादामुळे गेल्या महासभेत पाणीटंचाईच्या लक्षवेधीवरून ओमी टीमच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रकरणावरून दोन्ही पक्षातील वाद जास्त ताणले गेले. गेल्या महासभेत १३ विशेष समिती सदस्य निवडण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र सत्ताधारी पक्षातील वाद बघता ऐन वेळी महापौर मीना आयलानी यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलला. आता २ मे रोजी महासभा बोलाविण्यात आली असून त्यात विशेष समिती सदस्यांची निवड होणार आहे.महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाकडे असून उपमहापौरपद साई पक्षाकडे आहे. चारपैकी दोन प्रभाग समिती सभापतीपदे साई पक्षाकडे, तर एक भाजपाकडे आहे. चौथे सभापतीपद शिवसेनेकडे गेले आहे. भाजपा आणि साई पक्षाने ओमी टीमला पदापासून बाजूला ठेवले असून सत्तेत समान वाटा मिळण्यासाठी नऊ ऐवजी १३ विशेष समित्याची स्थापना केली जाणार आहे. २ मेच्या महासभेत विशेष समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीपदाची निवड होणार आहे.आताच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत विशेष समित्यांत भाजपा ओमी टीमच्या सदस्यांना स्थान देणार की शिवसेनेला खूष करणार हा प्रश्न भाजपापुढे आहे. विशेष समितीपासूनही ओमी टीमला भाजपाने बाजूला ठेवले तर उल्हासनगरातील सत्तांतर अटळ आहे. शिवसेनेला समितीत स्थान देऊन भाजपा नेते त्या पक्षाला सत्तेत वाटा देण्याची सुरूवात या निवडणुकीपासून करेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.जिल्हा नियोजन समिती निवडणुकीवरही नजरमहापालिकेतील एकूण सदस्यसंख्या पाहता जिल्हा नियोजन समितीत तीन सदस्य निवडून जाऊ शकतात. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्योती गायकवाड; तर भाजपाकडून महेश सुखरामनी व ओमी टीमच्या पंचम कालानी यांनी अर्ज दाखल केले. ११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाने ज्योती पिंटो भटिजा व गजानन शेळके यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने पंचम कलानी यांना पाठिंबा दिला नाही, तर त्यांचा पराभव निश्चित असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर