शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईने उल्हासनगरवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:40 IST

जलवाहिनी फुटली : तीन दिवसांपासून पुरवठा बंद, टॅंकरने पाणी

उल्हासनगर : शीळफाटा परिसरात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगरसह अन्य शहरांचा पाणीपुरवठा बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने शहर पूर्व व कॅम्प नं ३ परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी पुरावठ्याचा स्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव येथील जलसाठ्यातून पाणीपुरवठा होतो, तर शहर पश्चिमेला उल्हास नदीतून पुरवठा होतो. शहर पश्चिममधील बहुतांश भागाला पाणीपुरवठा होत असलातरी पूर्वेसह इतर शहरांना गेल्या तीन दिवासांपासून पाणीपुरवठा बंद आहे. महिलांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शीळ फाटा येथील दुरुस्ती केलेली जलवाहिनी पुन्हा फुटल्याने टंचाईची समस्या निर्माण झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.

शहर पूर्वेतील काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते भरत गंगोत्री, शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, भारिपाचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रभाग समिती क्र. ४च्या सभापती अंजली साळवे यांच्यासह अन्य नगरसेवक पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्या संपर्कात आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची महिती सोनावणे यांनी दिली.

अंबरनाथमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने, गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका अंबरनाथ शहराला बसला असून, गेल्या दोन दिवसांपासून शहरात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी आणि बारवी धरणातून एमआयडीसीमार्फत दहा दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, बारवी जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, त्याचा फटका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला, त्यातच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ एमायडीसीवर आली. एमआयडीसीचा पाणीपुरवठा अंबरनाथ शहरासाठी बंद झाल्याने, त्याचा फटका शहरातील इतर भागाला सहन करावा लागला. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने अनेक ठिकाणी टँकर मागविण्याची वेळ आली होती, तर सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे