शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

टंचाईने उल्हासनगरवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:40 IST

जलवाहिनी फुटली : तीन दिवसांपासून पुरवठा बंद, टॅंकरने पाणी

उल्हासनगर : शीळफाटा परिसरात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगरसह अन्य शहरांचा पाणीपुरवठा बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने शहर पूर्व व कॅम्प नं ३ परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी पुरावठ्याचा स्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव येथील जलसाठ्यातून पाणीपुरवठा होतो, तर शहर पश्चिमेला उल्हास नदीतून पुरवठा होतो. शहर पश्चिममधील बहुतांश भागाला पाणीपुरवठा होत असलातरी पूर्वेसह इतर शहरांना गेल्या तीन दिवासांपासून पाणीपुरवठा बंद आहे. महिलांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शीळ फाटा येथील दुरुस्ती केलेली जलवाहिनी पुन्हा फुटल्याने टंचाईची समस्या निर्माण झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.

शहर पूर्वेतील काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते भरत गंगोत्री, शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, भारिपाचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रभाग समिती क्र. ४च्या सभापती अंजली साळवे यांच्यासह अन्य नगरसेवक पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्या संपर्कात आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची महिती सोनावणे यांनी दिली.

अंबरनाथमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने, गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका अंबरनाथ शहराला बसला असून, गेल्या दोन दिवसांपासून शहरात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी आणि बारवी धरणातून एमआयडीसीमार्फत दहा दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, बारवी जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, त्याचा फटका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला, त्यातच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ एमायडीसीवर आली. एमआयडीसीचा पाणीपुरवठा अंबरनाथ शहरासाठी बंद झाल्याने, त्याचा फटका शहरातील इतर भागाला सहन करावा लागला. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने अनेक ठिकाणी टँकर मागविण्याची वेळ आली होती, तर सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे