शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईने उल्हासनगरवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:40 IST

जलवाहिनी फुटली : तीन दिवसांपासून पुरवठा बंद, टॅंकरने पाणी

उल्हासनगर : शीळफाटा परिसरात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगरसह अन्य शहरांचा पाणीपुरवठा बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने शहर पूर्व व कॅम्प नं ३ परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी पुरावठ्याचा स्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव येथील जलसाठ्यातून पाणीपुरवठा होतो, तर शहर पश्चिमेला उल्हास नदीतून पुरवठा होतो. शहर पश्चिममधील बहुतांश भागाला पाणीपुरवठा होत असलातरी पूर्वेसह इतर शहरांना गेल्या तीन दिवासांपासून पाणीपुरवठा बंद आहे. महिलांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शीळ फाटा येथील दुरुस्ती केलेली जलवाहिनी पुन्हा फुटल्याने टंचाईची समस्या निर्माण झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.

शहर पूर्वेतील काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते भरत गंगोत्री, शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, भारिपाचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रभाग समिती क्र. ४च्या सभापती अंजली साळवे यांच्यासह अन्य नगरसेवक पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्या संपर्कात आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची महिती सोनावणे यांनी दिली.

अंबरनाथमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने, गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका अंबरनाथ शहराला बसला असून, गेल्या दोन दिवसांपासून शहरात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी आणि बारवी धरणातून एमआयडीसीमार्फत दहा दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, बारवी जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, त्याचा फटका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला, त्यातच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ एमायडीसीवर आली. एमआयडीसीचा पाणीपुरवठा अंबरनाथ शहरासाठी बंद झाल्याने, त्याचा फटका शहरातील इतर भागाला सहन करावा लागला. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने अनेक ठिकाणी टँकर मागविण्याची वेळ आली होती, तर सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे