शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

उल्हासनगर पालिका : महापौरपदाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 03:19 IST

पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महापौरपदाचा प्रश्न लटकणार असे बोलले जात आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महापौरपदाचा प्रश्न लटकणार असे बोलले जात आहे.मीना आयलानी यांच्या महापौरपदाला पाच जुलैला सव्वावर्ष होताच ओमी टीमने भाजपातील निष्ठांवत गटाला सोबत घेवून गेल्या आठवडयात नागपूर गाठले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेवून महापौरपदाची आठवण करून दिली. पावसाळी अधिवेशनानंतर दिलेला शब्द पूर्ण करणार अशी ग्वाही या निष्ठावंत गटाला दिल्याचे समजते.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार ज्योती कलानी, नरेंद्र पवार, सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह ओमी टीमचे विश्वासू राजेश वधारिया आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुरस्वानी यांनी पत्रकार परिषद घेत मीना आयलानी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार जुलैच्या अखेर महापौरपदाचा राजीनामा देणार असे जाहीर करून टाकले. त्याचवेळी आयलानी, महापौरांनी राजीनामा देण्याबाबत मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले नसल्याचे सांगितले. यामुळे भाजपातील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. मूळात आयलानी यांची कलानी यांना सत्तेत घेऊ नये अशीच पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. सभागृह नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत मला ठाऊक नसल्याचे सांगत आयलानी यांनी निष्ठावंत गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यातून पक्षात आलबेल नाही हे सिद्ध झाले.ओमी विरोधकांची मोट बांधणारशहर विकासाबाबत कुमार आयलानी, महापौर आयलानी यांनी ओमी टीम व भाजपातील निष्ठावंत गटाला डावलून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमहापौर जीवन इदनानी, रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री सोबत होते. पालिकेत साई पक्षाचे १२, रिपाइं गटाचे ३ व राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. आयलानी, इदनानी, भालेराव व गंगोत्री ओमी कलानी टीमचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.विकासकामांबाबत महासभामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी शहर विकासासाठी ३५० कोटीचा निधी देण्याचे संकेत दिले होते. या निधीतून शहरातील रस्ते, पाणी टंचाई, वृक्षारोपण आदी कामे होणार आहेत. याबाबत १८ व २० जुलैला महासभा व विशेष महासभा होणार असून यासंदर्भात गुरूवारी महापौरांच्या दालनात बैठक झाली.ओमी टीमला पदापासून ठेवले दूरउल्हासनगर पालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर येथील पदे भाजपाने स्वत:कडे तसेच साई पक्षाकडे ठेवली. सत्तेत सहभागी असूनही ओमी टीमला पदापासून कायम दूर ठेवले. अगदी प्रभाग समिती सदस्य, सभापतीपदही टीमला मिळणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतली होती. त्यामुळे एकेकाळी कलानी यांचे वर्चस्व असलेल्या पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपाला यश आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या