शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिका : भुयारी गटार योजना वादात? नगररचनाकार विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:00 IST

महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप

उल्हासनगर : महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक अरूण अशान यांनी केला. एकूण २२३ कोटींची योजना असल्याची माहिती पालिकेने दिली.उल्हासनगर महापालिकेने केंद्र व राज्य सरकारकडे भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र सरकारने २९० ऐवजी २२३ कोटीच्या योजनेला तीन टप्यात मंजुरी दिली. पहिल्या टप्याच्या ७१ कोटीच्या कामाला मंजुरी देत काम सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. सुरूवातीला पालिकेने सलग चार वेळा निविदा काढूनही कंत्राटदार मिळाला नाही. योजनेसाठी आलेला ३३ कोटीचा निधी परत जातो की काय? असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला होता. अखेर पालिकेला कंत्राटदार मिळून पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली.महापालिका स्थायी समितीने मंगळवारच्या सभेत एकमताने मंजुरी दिली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक अशान यांनी योजनेच्या मंजुरीवर आक्षेप घेतला. शहराच्या नवीन विकास आराखडयानुसार नगररचनाकार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. तसे प्रमाणपत्र न घेतल्याने ३०० कोटीच्या पाणी पुरवठा योजनेप्रमाणे भुयारी गटार योजना वादात सापडण्याची शक्यता आहे. योजना वादात सापडू नये म्हणून सरकारसह संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिका नियोजन समितीच्या सभापती ज्योस्त्ना जाधव यांनीही भुयारी गटार योजनेवर आक्षेप घेतला आहे.शहरातील भुयारी गटाराची क्षमता संपून ओव्हरफ्लो होत आहेत. तसेच मलशुध्दीकरण केंद्राकडे जाणारे बहुतांश सांडपाण्याचे पाईप २६ जुलैच्या महापुरात वाहून गेले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसून थेट वालधुनी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात मलनिस:रण केंद्राकडे जाणाºया मुख्य सांडपाणी जलवाहिन्यांसह इतर मुख्य जलवाहिन्यांचे सांडपाणी एकत्र करून पम्पिंग स्टशेनद्वारे मलनिसारण केंद्रात सोडले जाणार आहे. तेथे प्रक्रिया करून पाणी खाडीत सोडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र्र निंबाळकर यांनी दिली. तसेच योजनेला नगररचनाकार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे की नाही, याची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर