शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

उल्हासनगर पालिका : भुयारी गटार योजना वादात? नगररचनाकार विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:00 IST

महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप

उल्हासनगर : महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक अरूण अशान यांनी केला. एकूण २२३ कोटींची योजना असल्याची माहिती पालिकेने दिली.उल्हासनगर महापालिकेने केंद्र व राज्य सरकारकडे भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र सरकारने २९० ऐवजी २२३ कोटीच्या योजनेला तीन टप्यात मंजुरी दिली. पहिल्या टप्याच्या ७१ कोटीच्या कामाला मंजुरी देत काम सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. सुरूवातीला पालिकेने सलग चार वेळा निविदा काढूनही कंत्राटदार मिळाला नाही. योजनेसाठी आलेला ३३ कोटीचा निधी परत जातो की काय? असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला होता. अखेर पालिकेला कंत्राटदार मिळून पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली.महापालिका स्थायी समितीने मंगळवारच्या सभेत एकमताने मंजुरी दिली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक अशान यांनी योजनेच्या मंजुरीवर आक्षेप घेतला. शहराच्या नवीन विकास आराखडयानुसार नगररचनाकार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. तसे प्रमाणपत्र न घेतल्याने ३०० कोटीच्या पाणी पुरवठा योजनेप्रमाणे भुयारी गटार योजना वादात सापडण्याची शक्यता आहे. योजना वादात सापडू नये म्हणून सरकारसह संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिका नियोजन समितीच्या सभापती ज्योस्त्ना जाधव यांनीही भुयारी गटार योजनेवर आक्षेप घेतला आहे.शहरातील भुयारी गटाराची क्षमता संपून ओव्हरफ्लो होत आहेत. तसेच मलशुध्दीकरण केंद्राकडे जाणारे बहुतांश सांडपाण्याचे पाईप २६ जुलैच्या महापुरात वाहून गेले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसून थेट वालधुनी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात मलनिस:रण केंद्राकडे जाणाºया मुख्य सांडपाणी जलवाहिन्यांसह इतर मुख्य जलवाहिन्यांचे सांडपाणी एकत्र करून पम्पिंग स्टशेनद्वारे मलनिसारण केंद्रात सोडले जाणार आहे. तेथे प्रक्रिया करून पाणी खाडीत सोडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र्र निंबाळकर यांनी दिली. तसेच योजनेला नगररचनाकार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे की नाही, याची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर