शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

उल्हासनगर महापालिका परिवहन समिती बरखास्त?; नागरिकांचे बससेवेचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:44 IST

परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

- सदानंद नाईक

उल्हासनगर : ठप्प पडलेली महापालिका परिवहन बस सेवा गेल्या ४ वर्षांपासून सुरू करण्यात अपयश आल्याने परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव १७ फेब्रुवारीच्या महासभेत आला. परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील कलानी समर्थकांची सत्ता उलथून टाकणाऱ्या शिवसेना- भाजपने धुमधडाक्यात महापालिका परिवहन बससेवा खाजगी ठेकेदारा मार्फत जानेवारी २०१० साली सुरू केली. तर सन २००७ साली परिवहन समितीची स्थापना करण्यात आली होती.

परिवहन बस सेवेचे नागरिकांनी जोशात स्वागत केले असून अल्प दरात शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता येत होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण शहारा पर्यंत बस सेवेचा विस्तार झाला होता. महापालिकेने ठेकेदारांच्या मागणी नुसार तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग, बस थांब्याकरीता भाडेतत्वावर विठ्ठलवाडी अम्ब्रॉसिया हॉटेल जवळील आरक्षण क्रं-१९३ व कैलास कॉलनी येथील आरक्षण क्रं-५० चे भूखंड ठेकेदाराला देण्यात आले होते. 

महापालिका परिवहन बसेस चांगल्या प्रकारे सुरू असताना, बस तिकीट दरवाढीच्या मागणी वरून महापालिका व ठेकेदार आमनेसामने आले. तिकीट दरवाढ दिली जात नसल्याने, ठेकेदाराने टप्याटप्याने परिवहन बस सेवा बंद करण्यास सुरुवात केली. जुलै २०१४ मध्ये अवघ्या साडे ४ वर्षात सुरू झालेली परिवहन बस सेवा ठप्प झाली.

नागरिक व राजकीय पक्षाच्या मागणीनुसार परिवहन बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. मात्र महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान पूर्वी प्रमाणे राज्य महामंडळाच्या बसेस शहरातून सुरू करा. अशी विनंती करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. एकीकडे परिवहन बस सेवा बंद असताना, दुसरीकडे परिवहन समितीवर लाखो रुपयांचा खर्च सुरू होता. तो खर्च टाळण्यासाठी परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून महासभेत आणण्यात आल्याचे बोलले जाते. 

परिवहन बस सेवा हवी, सत्ताधाऱ्यांचे अपयश

 महापालिका परिवहन बस सेवा शिवसेनेच्या सत्ताकाळात धुमधडाक्यात सुरू झाली होती. त्यांच्याच सत्ताकाळात परिवहन समिती बरखास्त करण्याची वेळ आल्याची टीका होत आहे. चार वर्षात परिवहन बस सेवेचे स्वप्न सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आल्याचीही टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे