शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

उल्हासनगर महापालिका परिवहन समिती बरखास्त?; नागरिकांचे बससेवेचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:44 IST

परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

- सदानंद नाईक

उल्हासनगर : ठप्प पडलेली महापालिका परिवहन बस सेवा गेल्या ४ वर्षांपासून सुरू करण्यात अपयश आल्याने परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव १७ फेब्रुवारीच्या महासभेत आला. परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील कलानी समर्थकांची सत्ता उलथून टाकणाऱ्या शिवसेना- भाजपने धुमधडाक्यात महापालिका परिवहन बससेवा खाजगी ठेकेदारा मार्फत जानेवारी २०१० साली सुरू केली. तर सन २००७ साली परिवहन समितीची स्थापना करण्यात आली होती.

परिवहन बस सेवेचे नागरिकांनी जोशात स्वागत केले असून अल्प दरात शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता येत होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण शहारा पर्यंत बस सेवेचा विस्तार झाला होता. महापालिकेने ठेकेदारांच्या मागणी नुसार तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग, बस थांब्याकरीता भाडेतत्वावर विठ्ठलवाडी अम्ब्रॉसिया हॉटेल जवळील आरक्षण क्रं-१९३ व कैलास कॉलनी येथील आरक्षण क्रं-५० चे भूखंड ठेकेदाराला देण्यात आले होते. 

महापालिका परिवहन बसेस चांगल्या प्रकारे सुरू असताना, बस तिकीट दरवाढीच्या मागणी वरून महापालिका व ठेकेदार आमनेसामने आले. तिकीट दरवाढ दिली जात नसल्याने, ठेकेदाराने टप्याटप्याने परिवहन बस सेवा बंद करण्यास सुरुवात केली. जुलै २०१४ मध्ये अवघ्या साडे ४ वर्षात सुरू झालेली परिवहन बस सेवा ठप्प झाली.

नागरिक व राजकीय पक्षाच्या मागणीनुसार परिवहन बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. मात्र महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान पूर्वी प्रमाणे राज्य महामंडळाच्या बसेस शहरातून सुरू करा. अशी विनंती करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. एकीकडे परिवहन बस सेवा बंद असताना, दुसरीकडे परिवहन समितीवर लाखो रुपयांचा खर्च सुरू होता. तो खर्च टाळण्यासाठी परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून महासभेत आणण्यात आल्याचे बोलले जाते. 

परिवहन बस सेवा हवी, सत्ताधाऱ्यांचे अपयश

 महापालिका परिवहन बस सेवा शिवसेनेच्या सत्ताकाळात धुमधडाक्यात सुरू झाली होती. त्यांच्याच सत्ताकाळात परिवहन समिती बरखास्त करण्याची वेळ आल्याची टीका होत आहे. चार वर्षात परिवहन बस सेवेचे स्वप्न सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आल्याचीही टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे