शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका परिवहन समिती बरखास्त?; नागरिकांचे बससेवेचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:44 IST

परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

- सदानंद नाईक

उल्हासनगर : ठप्प पडलेली महापालिका परिवहन बस सेवा गेल्या ४ वर्षांपासून सुरू करण्यात अपयश आल्याने परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव १७ फेब्रुवारीच्या महासभेत आला. परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील कलानी समर्थकांची सत्ता उलथून टाकणाऱ्या शिवसेना- भाजपने धुमधडाक्यात महापालिका परिवहन बससेवा खाजगी ठेकेदारा मार्फत जानेवारी २०१० साली सुरू केली. तर सन २००७ साली परिवहन समितीची स्थापना करण्यात आली होती.

परिवहन बस सेवेचे नागरिकांनी जोशात स्वागत केले असून अल्प दरात शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता येत होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण शहारा पर्यंत बस सेवेचा विस्तार झाला होता. महापालिकेने ठेकेदारांच्या मागणी नुसार तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग, बस थांब्याकरीता भाडेतत्वावर विठ्ठलवाडी अम्ब्रॉसिया हॉटेल जवळील आरक्षण क्रं-१९३ व कैलास कॉलनी येथील आरक्षण क्रं-५० चे भूखंड ठेकेदाराला देण्यात आले होते. 

महापालिका परिवहन बसेस चांगल्या प्रकारे सुरू असताना, बस तिकीट दरवाढीच्या मागणी वरून महापालिका व ठेकेदार आमनेसामने आले. तिकीट दरवाढ दिली जात नसल्याने, ठेकेदाराने टप्याटप्याने परिवहन बस सेवा बंद करण्यास सुरुवात केली. जुलै २०१४ मध्ये अवघ्या साडे ४ वर्षात सुरू झालेली परिवहन बस सेवा ठप्प झाली.

नागरिक व राजकीय पक्षाच्या मागणीनुसार परिवहन बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. मात्र महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान पूर्वी प्रमाणे राज्य महामंडळाच्या बसेस शहरातून सुरू करा. अशी विनंती करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. एकीकडे परिवहन बस सेवा बंद असताना, दुसरीकडे परिवहन समितीवर लाखो रुपयांचा खर्च सुरू होता. तो खर्च टाळण्यासाठी परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून महासभेत आणण्यात आल्याचे बोलले जाते. 

परिवहन बस सेवा हवी, सत्ताधाऱ्यांचे अपयश

 महापालिका परिवहन बस सेवा शिवसेनेच्या सत्ताकाळात धुमधडाक्यात सुरू झाली होती. त्यांच्याच सत्ताकाळात परिवहन समिती बरखास्त करण्याची वेळ आल्याची टीका होत आहे. चार वर्षात परिवहन बस सेवेचे स्वप्न सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आल्याचीही टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे