शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उल्हासनगर महापालिका कर्मचारी पगारविना, शासन अनुदानानंतरच पगार, कर्मचाऱ्यात असंतोष

By सदानंद नाईक | Updated: April 8, 2023 17:32 IST

उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महापालिकेला शासन अनुदानाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.

उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर वसुली ६५ कोटी होऊनही कर्मचारी पगार विना असल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शासनाच्या अनुदानानंतर कर्मचाऱ्यांचे पगार होणार असल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महापालिकेला शासन अनुदानाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. मार्च महिना अखेर महापालिका मालमत्ता कर वसुली ६५ कोटी तर नगररचनाकार विभागाकडून ४० ,कोटीचे उत्पन्न येऊनही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही. अशी टीका होत आहे तर दुसरीकडे शासन अनुदान मिळाले नसल्याने, कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याचे, मुख्यलेखा अधिकारी सांगत आहेत. मग मालमत्ता कर विभाग व नगररचनाकार विभागाकडून मिळालेले उत्पन्न गेले कुठे? असा प्रश्न कर्मचारी संघटनेच्या नेत्याला पडला आहे. शासनाकडून दरमहा १७ कोटीचे जीएसटी अनुदान मिळत असल्याने, महापालिकेचा गाडा हाकलला जातो. शासन अनुदान न मिळाल्यास, महापालिका कारभार ठप्प पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने, घराचे बँक हप्ते, मुलांचे शिक्षण, घरगुती खर्च व घरगुती किराणा कसा भरायचा? असा प्रश्न कर्मचाऱ्यापुढे उभा ठाकला आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाची १०९ कोटींची करवसुली झाली होती. त्यामुळे शहर विकास साधता आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता कर वसुली बाबत असमाधान व्यक्त केले. १४० कोटीचे टार्गेट असताना फक्त ६५ कोटींची वसुली झाल्याने, विभागावर टीकेची झोळ उठली आहे. वसुली कमी झाल्यानेच, महापालिकेला कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी शासन अनुदानांकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली. सोमवारी शासन अनुदान आलेतरच, मंगळवारी कर्मचाऱ्याचे पगार होणार आहेत. याबाबत आयुक्त अजीज शेख यांच्याशी संपर्क झाला नाही. तर कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांना सोमवारी पगार होणार असल्याचा दिलासा देत आहेत. 

साफसफाईचे खाजगीकरण का? 

महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी शासन अनुदानांची वाट पहावी लागते. अशी आर्थिक परिस्थिती महापालिकेचीबअसतांना प्रभाग समिती क्रं-३ मधील साफसफाईचे खाजगीकरण कोणासाठी केले. असा प्रश्न विचारला जात आहे. क साफसफाईच्या खाजगीकरणमुळे वर्षाला १० कोटी पेक्षा जास्त भुर्दंड महापालिकेवर पडणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर