शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उल्हासनगर महापालिका कर्मचारी पगारविना, शासन अनुदानानंतरच पगार, कर्मचाऱ्यात असंतोष

By सदानंद नाईक | Updated: April 8, 2023 17:32 IST

उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महापालिकेला शासन अनुदानाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.

उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर वसुली ६५ कोटी होऊनही कर्मचारी पगार विना असल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शासनाच्या अनुदानानंतर कर्मचाऱ्यांचे पगार होणार असल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महापालिकेला शासन अनुदानाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. मार्च महिना अखेर महापालिका मालमत्ता कर वसुली ६५ कोटी तर नगररचनाकार विभागाकडून ४० ,कोटीचे उत्पन्न येऊनही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही. अशी टीका होत आहे तर दुसरीकडे शासन अनुदान मिळाले नसल्याने, कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याचे, मुख्यलेखा अधिकारी सांगत आहेत. मग मालमत्ता कर विभाग व नगररचनाकार विभागाकडून मिळालेले उत्पन्न गेले कुठे? असा प्रश्न कर्मचारी संघटनेच्या नेत्याला पडला आहे. शासनाकडून दरमहा १७ कोटीचे जीएसटी अनुदान मिळत असल्याने, महापालिकेचा गाडा हाकलला जातो. शासन अनुदान न मिळाल्यास, महापालिका कारभार ठप्प पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने, घराचे बँक हप्ते, मुलांचे शिक्षण, घरगुती खर्च व घरगुती किराणा कसा भरायचा? असा प्रश्न कर्मचाऱ्यापुढे उभा ठाकला आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाची १०९ कोटींची करवसुली झाली होती. त्यामुळे शहर विकास साधता आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता कर वसुली बाबत असमाधान व्यक्त केले. १४० कोटीचे टार्गेट असताना फक्त ६५ कोटींची वसुली झाल्याने, विभागावर टीकेची झोळ उठली आहे. वसुली कमी झाल्यानेच, महापालिकेला कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी शासन अनुदानांकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली. सोमवारी शासन अनुदान आलेतरच, मंगळवारी कर्मचाऱ्याचे पगार होणार आहेत. याबाबत आयुक्त अजीज शेख यांच्याशी संपर्क झाला नाही. तर कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांना सोमवारी पगार होणार असल्याचा दिलासा देत आहेत. 

साफसफाईचे खाजगीकरण का? 

महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी शासन अनुदानांची वाट पहावी लागते. अशी आर्थिक परिस्थिती महापालिकेचीबअसतांना प्रभाग समिती क्रं-३ मधील साफसफाईचे खाजगीकरण कोणासाठी केले. असा प्रश्न विचारला जात आहे. क साफसफाईच्या खाजगीकरणमुळे वर्षाला १० कोटी पेक्षा जास्त भुर्दंड महापालिकेवर पडणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर