शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

Ulhasnagar | उल्हासनगर महापालिका पाण्याबाबत होणार स्वयंपूर्ण!

By सदानंद नाईक | Updated: December 17, 2022 17:34 IST

 २१० कोटीच्या निधीतून पाणी योजना

सदानंद नाईक, उल्हासनगर: बारमाही उल्हास नदी शहरात वाहत असतांना महापालिका पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून आहे. दरम्यान २१० कोटीच्या निधीतून महापालिका केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत स्वतःची पाणी पुरवठा वितरण योजना राबविणार असून जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी पुरवठा स्रोत योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीकडून शहराला दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. मात्र पाणी वितरणाच्या दोषामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली. केंद्र शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत महापालिकेने स्वतःची पाणी पुरवठा योजना प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सल्लागाराकडून सुरु केला. तसेच योजना अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सादर करण्यात येणार आहे.

महापालिका स्वमालकीचा उद्भव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्पाची किंमत २१० कोटी १० लाख आहे. उल्हासनदी किनारी उद्भव विहीर व पंपहाऊस बांधण्यात येणार आहे. नदीतील पाणी प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत १६०० मी. मी. व्यासाची उध्दरण वाहिनीद्वारे आणण्यात येणार आहे. जलवाहिणीचे एकून लांबी ३१०० मी.मी. असून कानसई टेकडीवर जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्याची क्षमता २०० द.ल.ली असणार आहे. शुध्दीकरण केंद्राजवळ २० द.ल.ली क्षमतेची मुख्य साठवण टाकी बांधण्यात येणार असून जलशुध्दीकरण केंद्रापासुन १५५० ते ५०० मी.मी. व्यासाच्या साठवण टाक्यांकरीता ९.५० की.मी. लांबीच्या उर्ध्ववाहिन्या टाकण्यात येणार आहे. यासह विद्युत पुरवठा घेणे, कर्मचारी निवास्थाने, रस्ते, रेल्वे क्रॉसींग मान्यता, परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. स्वतःची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास, महापालिकेचे दरमहा पाणी बिलाचे ३ कोटी तर वर्षाला ३० कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करते. ती रक्कम महापालिकेच्या स्वतःचे पाणी स्रोत निर्माण झाल्याने वाचणार आहे. तसेच नागरिकांना स्वस्त दराने, नियमित व मुबलक प्रांगणात पाणी पुरवठा महापालिका करणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकulhasnagarउल्हासनगर