शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका १६७ भूखंडाच्या सनदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील विकासकामांसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या १६७ भूखंडाना सनद देऊन त्यांचे हस्तांतरण करण्याची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील विकासकामांसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या १६७ भूखंडाना सनद देऊन त्यांचे हस्तांतरण करण्याची मागणी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आतापर्यंत फक्त नऊ भूखंडानाच सनद देऊन शासनाने ते रितसर महापालिकेकडे हस्तांतरण केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

उल्हासनगरातील जागेची मालकी महापालिकेऐवजी राज्य शासनाकडे आहे. यामुळे आरक्षित भूखंड महापालिका ताब्यात असूनही त्यांची भूखंडाची मालकी राज्य शासनाकडे असल्याने त्यांचा विकास करताना अडथळे येतात. यात महापालिका मुख्यालयाच्या जागेची मालकीहक्क सुद्धा राज्य शासनाकडे आहे. तत्कालीन महापौर पंचम कलानी यांच्या कालावधीत गोलमैदान, हिराघाट बोटक्लब, आयडीआय कंपनीजवळील कब्रस्तान, व्हीटीसी ग्राउंड, इंदिरा गांधी भाजीमंडई या नऊ भूखंडांना सनद देऊन शासनाने ते महापालिकेकडे हस्तांतर केले आहेत. त्यानंतर उर्वरित १६७ भूखंडानाही सनद देऊन ते महापालिकेला हस्तांतरित करण्याचे पत्र कलानी यांनी प्रांत कार्यालयासह जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. मात्र, त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने विद्यमान आयुक्तांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.

शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण होऊन, त्यामधील विस्थापितांना पर्यायी जागा देण्यासाठी जागेचा शोधाशोध सुरू केला असता ही बाब उघडकीस झाल्यानंतर हा विषय पुन्हा ऐरवणीवर आला आहे.

देशाच्या फाळणी वेळी सिंध प्रांतातून विस्थापित झालेल्या बहुतांश सिंधी समाजाला कल्याण शहराजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या बैरेक व खुल्या जागेवर वसविण्यात आले. या विस्थापित वस्तीला उल्हास नदीवरून उल्हासनगर नाव देण्यात आले. शहराच्या जागेची मालकी आदी केंद्र शासनाकडे होती. कालांतराने केंद्र शासनाने जागेची मालकी राज्य शासनाकडे दिली. मात्र, राज्य शासनाने जागेची मालकी महापालिकेला हस्तांतरण केली नाही. यातूनच भूखंडांना सनद मागण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

भूखंडाच्या सनदीबाबत माहिती नाही.....आमदार आयलानी

शहरात धोकादायक इमारतींच्या प्रश्नावरून राजकीय पक्षात रणकंदन उडाले, तर दुसरीकडे शहराचे आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका भूखंडाच्या सनदीबाबत माहीत नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.