शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उल्हासनगर महापालिकेची रस्त्यावरील गाड्यांवर कारवाई, २० हजाराचा दंड, साहित्य जप्त

By सदानंद नाईक | Updated: September 20, 2022 18:06 IST

उल्हासनगर महापालिकेने रस्त्यावरील गाड्यांवर कारवाई करून 20 हजारांचा दंड ठोठावला. 

उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर कार बाजार व गॅरेजवाले दुकानदार यांनी मुख्य रस्त्याला लागून गाड्या उभ्या केल्याप्रकरणी महापालिकेने धडक कारवाई केली. कारवाईत अनेक साहित्य जप्त केले असून २० हजाराचा दंड ठोठावल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. 

उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर गाड्यांचे गॅरेज दुकान व कार बाजार प्रसिद्ध आहे. कार बाजार व गॅरेज दुकानदार मुख्य रस्त्यालगत धोकादायक स्थितीत गाड्या उभ्या केल्या जातात. महापालिकेने वेळोवेळी कारवाई करून परिस्थिती जैसे थी आहे. मंगळवारी दुपारी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग समिती क्रं-२ चे प्रभाग अधिकारी तुषार सोनावणे व अतिक्रमण पथकाने रस्त्यावर असणाऱ्या गाड्यावर व साहित्यावर कारवाई केली. यावेळी विविध साहित्य जप्त करण्यात आले. तर कार बाजार व गॅरेज दुकानदार यांच्याकडून २० हजाराचा दंड वसूल केला. अशी माहिती सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली.

शहरातील रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनासह हातगाड्यावर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेला जाग येऊन कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावरील कार बाजार व गॅरेज दुकानदारांवर कार रस्त्यावर उभी केली व साहित्य रस्त्यावर ठेवल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली. तसेच विविध साहित्य महापालिका अतिक्रमण पथकाने जप्त केले.कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त शिंपी यांनी दिले.

 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर