शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

उल्हासनगर महापालिका अभय योजना फ्लॉप?; १३ दिवसात फक्त १ कोटी ६५ लाखाची वसुली

By सदानंद नाईक | Updated: October 29, 2022 15:49 IST

उल्हासनगर महापालिकेने भांडवली मूल्य कर प्रणाली सुरू केल्यावर, नागरिकांच्या मालमत्ता कर बिलात दुप्पट-तिप्पट वाढ झाली.

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांनी ऐन दिवाळी सणा पूर्वी मालमत्ता कर विभागासाठी १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अभय योजना जाहीर केली. मात्र नागरिकांनी अभय योजनेकडे पाठ फिरवली असून २७ ऑक्टोबर पर्यंत फक्त १ कोटी ६५ लाख ७२ हजार ५२ रुपयांची वसुली झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेने भांडवली मूल्य कर प्रणाली सुरू केल्यावर, नागरिकांच्या मालमत्ता कर बिलात दुप्पट-तिप्पट वाढ झाली. मालमत्ता कर वाढीचा विरोध सर्वच राजकीय पक्षांनी करून नागरिकांनी मालमत्ता कर बिल भरणाकडे पाठ फिरवली. दरम्यान भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द करण्याची मागणी भाजपसह बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांचा वाढता रोष बघून भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिली. त्यानंतर जुन्याच दराने महापालिकेला मालमत्ता कर बिल घरोघरी वितरीत करावी लागली. भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द झाल्याने, नागरिकांनी आनंद व्यक्त केला. महापालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागातून गेल्या ७ महिन्यात फक्त १० कोटींची वसुली झाली. विभागाला ११० कोटीचे टार्गेट असताना वसुली १० कोटीची वसुली झाल्याने, विभागावर टीका सुरू झाली.

दरम्यान महापालिकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी ऐन दिवाळी सणा समोर मालमत्ता कर उत्पन्न वसूल होण्यासाठी १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अभय योजना लागू केली. ३१ ऑक्टोबर पूर्वी मालमत्ता कर बिल १०० टक्के भरल्यास व्याज व दंड माफ होणार आहे. महापालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केल्यानंतरही नागरिकांनी योजनेकडे पाठ फिरवली. १५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान फक्त १ कोटी ६५ लाख ७७ हजाराचे कर बिल वसूल झाले. गेल्या वर्षी महापालिका आयुक्तांनी मार्च महिन्यात लावलेल्या अभय योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन ८० कोटींचा भरणा अवघ्या १५ दिवसात ८० कोटींची वसुली झाली होती. 

अभय योजनेला मुदत वाढीची मागणी महापालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केल्यावर गेल्या १५ दिवसात फक्त १ कोटी ६५ लाखाची वसुली झाली. ३१ ऑक्टोबर पर्यंत एकून २ कोटींची वसुली होण्याची शक्यता असून महापालिकेकडे अभय योजनेला मुदत देण्याची मागणी होत आहे. आयुक्तांच्याकडे याबाबत लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर