शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उल्हासनगर महापालिका अभय योजना फ्लॉप?; १३ दिवसात फक्त १ कोटी ६५ लाखाची वसुली

By सदानंद नाईक | Updated: October 29, 2022 15:49 IST

उल्हासनगर महापालिकेने भांडवली मूल्य कर प्रणाली सुरू केल्यावर, नागरिकांच्या मालमत्ता कर बिलात दुप्पट-तिप्पट वाढ झाली.

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांनी ऐन दिवाळी सणा पूर्वी मालमत्ता कर विभागासाठी १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अभय योजना जाहीर केली. मात्र नागरिकांनी अभय योजनेकडे पाठ फिरवली असून २७ ऑक्टोबर पर्यंत फक्त १ कोटी ६५ लाख ७२ हजार ५२ रुपयांची वसुली झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेने भांडवली मूल्य कर प्रणाली सुरू केल्यावर, नागरिकांच्या मालमत्ता कर बिलात दुप्पट-तिप्पट वाढ झाली. मालमत्ता कर वाढीचा विरोध सर्वच राजकीय पक्षांनी करून नागरिकांनी मालमत्ता कर बिल भरणाकडे पाठ फिरवली. दरम्यान भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द करण्याची मागणी भाजपसह बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांचा वाढता रोष बघून भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिली. त्यानंतर जुन्याच दराने महापालिकेला मालमत्ता कर बिल घरोघरी वितरीत करावी लागली. भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द झाल्याने, नागरिकांनी आनंद व्यक्त केला. महापालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागातून गेल्या ७ महिन्यात फक्त १० कोटींची वसुली झाली. विभागाला ११० कोटीचे टार्गेट असताना वसुली १० कोटीची वसुली झाल्याने, विभागावर टीका सुरू झाली.

दरम्यान महापालिकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी ऐन दिवाळी सणा समोर मालमत्ता कर उत्पन्न वसूल होण्यासाठी १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अभय योजना लागू केली. ३१ ऑक्टोबर पूर्वी मालमत्ता कर बिल १०० टक्के भरल्यास व्याज व दंड माफ होणार आहे. महापालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केल्यानंतरही नागरिकांनी योजनेकडे पाठ फिरवली. १५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान फक्त १ कोटी ६५ लाख ७७ हजाराचे कर बिल वसूल झाले. गेल्या वर्षी महापालिका आयुक्तांनी मार्च महिन्यात लावलेल्या अभय योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन ८० कोटींचा भरणा अवघ्या १५ दिवसात ८० कोटींची वसुली झाली होती. 

अभय योजनेला मुदत वाढीची मागणी महापालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केल्यावर गेल्या १५ दिवसात फक्त १ कोटी ६५ लाखाची वसुली झाली. ३१ ऑक्टोबर पर्यंत एकून २ कोटींची वसुली होण्याची शक्यता असून महापालिकेकडे अभय योजनेला मुदत देण्याची मागणी होत आहे. आयुक्तांच्याकडे याबाबत लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर