शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या महासभेत पुन्हा पाण्यावरून राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:51 IST

पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.

उल्हासनगर - पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले. त्यातही अपूर्ण पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रूपये तातडीने मिळावेत, यासाठी आग्रह धरल्याने त्याचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती.उल्हासनगरच्या विकासकामांसह नगरसेवक व प्रभाग समिती निधीतील कामे सुरू होत नाही, तोपर्यंत महासभा चालू देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या महासभेत घेतला होता. पण आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घनकचरा व्यवस्थापन कराला मान्यता दिली जात नाही, तोपर्यंत मूलभूत कामाव्यतिरिक्त इतर कामाना मंजुरी देता येणार नाही, असा प्रवित्रा घेतला होता. या प्रकाराने महापालिका आयुक्त विरूध्द नगरसेवक असा सामना रंगला. मात्र एका आठवड्यात चित्र पालटले आणि शहरहितासाठी नगरसेवक व आयुक्तांनी एक पाऊल मागे घेतले आणि महासभा पार पडली.ती सुरू होताच पाणीप्रश्नी सर्व नगरसेवक आक्रमक झाले. जलवाहिन्यांची गळती वर्षानुवर्ष सुरू असली, तरी दुरूस्ती होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे डॉ प्रकाश नाथानी, राजेश वानखडे, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, अरूण अशांत, रिपाइंचे भगवान भालेराव आदींनी पाणीप्रश्न लावून धरला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी गळतीबाबत उत्तर दिले, पण एकाच ठिकाणी वारंवार गळती का होते, या नगरसेवकांच्या प्रश्नावर ते निरूत्तर झाले.५० कोटींच्या निधीसाठीशहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा व गळती शून्यावर आणण्यासाठी ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना कोणार्क कंपनीमार्फत राबवण्यात आली. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. आता हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी मिळावेत, यासाठी आटापिटा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.पदोन्नती, नोकरभरती रेंगाळणारच्महापालिकेत अधिकांºयाची ७० टक्के, तर वर्ग ३ व ४ ची ३५ टक्के पदे रिक्त आहेत. काही पदे पदोन्नतीने व काही सरळसेवा भरतीने घेण्याचा निर्णय झाला होता.च्तसेच अनुकंपातत्वावरील नोकरभरतीतील वादही चव्हाट्यावर आले. पण पालिकेच्या खर्चाचा विचार करता एवढी पदे भरण्यास परवानगी मिळणार नसल्याचे आयुक्तांनी दाखवून दिल्याने ही पदे भरण्याची प्रक्रिया रेंगाळणार असल्याचे मानले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर