शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

उल्हासनगरच्या महासभेत पुन्हा पाण्यावरून राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:51 IST

पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.

उल्हासनगर - पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले. त्यातही अपूर्ण पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रूपये तातडीने मिळावेत, यासाठी आग्रह धरल्याने त्याचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती.उल्हासनगरच्या विकासकामांसह नगरसेवक व प्रभाग समिती निधीतील कामे सुरू होत नाही, तोपर्यंत महासभा चालू देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या महासभेत घेतला होता. पण आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घनकचरा व्यवस्थापन कराला मान्यता दिली जात नाही, तोपर्यंत मूलभूत कामाव्यतिरिक्त इतर कामाना मंजुरी देता येणार नाही, असा प्रवित्रा घेतला होता. या प्रकाराने महापालिका आयुक्त विरूध्द नगरसेवक असा सामना रंगला. मात्र एका आठवड्यात चित्र पालटले आणि शहरहितासाठी नगरसेवक व आयुक्तांनी एक पाऊल मागे घेतले आणि महासभा पार पडली.ती सुरू होताच पाणीप्रश्नी सर्व नगरसेवक आक्रमक झाले. जलवाहिन्यांची गळती वर्षानुवर्ष सुरू असली, तरी दुरूस्ती होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे डॉ प्रकाश नाथानी, राजेश वानखडे, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, अरूण अशांत, रिपाइंचे भगवान भालेराव आदींनी पाणीप्रश्न लावून धरला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी गळतीबाबत उत्तर दिले, पण एकाच ठिकाणी वारंवार गळती का होते, या नगरसेवकांच्या प्रश्नावर ते निरूत्तर झाले.५० कोटींच्या निधीसाठीशहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा व गळती शून्यावर आणण्यासाठी ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना कोणार्क कंपनीमार्फत राबवण्यात आली. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. आता हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी मिळावेत, यासाठी आटापिटा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.पदोन्नती, नोकरभरती रेंगाळणारच्महापालिकेत अधिकांºयाची ७० टक्के, तर वर्ग ३ व ४ ची ३५ टक्के पदे रिक्त आहेत. काही पदे पदोन्नतीने व काही सरळसेवा भरतीने घेण्याचा निर्णय झाला होता.च्तसेच अनुकंपातत्वावरील नोकरभरतीतील वादही चव्हाट्यावर आले. पण पालिकेच्या खर्चाचा विचार करता एवढी पदे भरण्यास परवानगी मिळणार नसल्याचे आयुक्तांनी दाखवून दिल्याने ही पदे भरण्याची प्रक्रिया रेंगाळणार असल्याचे मानले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर