शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

उल्हासनगरात संततधार पाऊस, वालधुनी नदी वाहते दुथडी भरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

उल्हासनगर : संततधार पावसाने मयूर हॉटेल, गोल मैदान, शांतीनगर स्मशानभूमी चौक, आदी सखल भागांत पाणी साचले होते. शहर पश्चिममध्ये ...

उल्हासनगर : संततधार पावसाने मयूर हॉटेल, गोल मैदान, शांतीनगर स्मशानभूमी चौक, आदी सखल भागांत पाणी साचले होते. शहर पश्चिममध्ये झाड पडल्याची, तर रमाबाई आंबेडकरनगरमध्ये साप निघाल्याची घटना घडली असून, वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे.

संततधार पावसामुळे बाजारपेठेच्या परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. गोल मैदान, शिरू चौक, मयूर हॉटेल, स्मशानभूमी चौक, कैलास कॉलनी, फर्निचर मार्केट परिसरांत पावसाचे पाणी साचले होते. शहर पश्चिममध्ये एक जुने झाड पडले असून आपत्कालीन विभागाने झाड हटविल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. संततधार पावसाने रस्ते खड्डेमय झाले. उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून, समतानगर येथील मुख्य रस्त्यावर असलेला नाल्यावरील पूल धोकादायक झाला आहे.

महापालिका आपत्कालीन विभागाने वालधुनी नदीकिनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोमवारी व मंगळवारी नदीच्या पुराचे पाणी भारतनगर, शांतीनगर येथील गहूबाई पाडा, सम्राट अशोकनगर, आदी परिसरांतील घरांत गेले होते. पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था महापालिकेने शाळा, समाजमंदिर परिसरांत केली होती. थारासिंग दरबार यांनी शेकडो नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.