शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उल्हासनगरात १२४ झाडे उन्मडून पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

उल्हासनगर : शहराला ‘तौउते’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून, १२४ पेक्षा जास्त झाडे उन्मडून पडली. झाडे उचलण्याचे काम अग्निशमन ...

उल्हासनगर : शहराला ‘तौउते’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून, १२४ पेक्षा जास्त झाडे उन्मडून पडली. झाडे उचलण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करीत असून, इमारती व घरांवरील लोखंडी पत्रे जोरदार वाऱ्याने उडून गेले. गांधी रोडला रिक्षावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, महापालिकेच्या पथकाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास मंगळवारपासून सुरुवात केली आहे.

झाड विजेच्या खांबावर पडल्याने ते पडून विजेच्या तारा तुटल्या आहेत. गेल्या २४ तासांपासून शहरातील बहुतांश भागांतील वीज गायब आहे, तसेच इंटरनेट सेवाही ठप्प पडली आहे. विजेचे खांब व तुटलेल्या तारा दुरुस्ती करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. विनापरवाना इमारतीवर उभारलेले अनेक लोखंडी पत्राचे शेड जोरदार वाऱ्याने उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर झाडे घरावर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले.

कॅम्प नं ५ गांधी रोड येथील जय बाबाधामसमोर एक जुने झाड रिक्षावर पडून लखुमल कामदार (६२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोरे नावाचा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. सरकारच्या आपत्कालीन निधीतून मृत्यू व जखमीला मदत देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविल्याची माहिती पालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.