शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

उल्हास नदी संशोधनासाठी विद्यापीठाचा तत्त्वत: होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:37 IST

नदी बचाव कृती समितीचा पाठपुरावा; जैवविविधतेचा अभ्यास होण्याची गरज, आता प्रतीक्षा अंतिम होकाराची

- मुरलीधर भवार कल्याण : ठाणे जिल्ह्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी ४८ लाख नागरिकांची तहान भागविते. ती राजमाचीपासून ते कल्याण खाडीपर्यंत नदीच्या किनारी असलेली शेती व निसर्ग फुलवते. त्यामुळे उल्हास नदीचे संशोधन केले जावे, अशी मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने राज्यपाल व मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली होती. त्यानुसार, नदीच्या संशोधनासाठी विद्यापीठ प्रशासनाने तत्त्वत: होकार दिला आहे. याविषयी बैठक घेऊन त्याचा निर्णय लवकर घेतला जाईल, असे समितीला कळविले आहे.राजमाचीच्या डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी कल्याण खाडीला येऊन मिळते. पुढे ती समुद्राला जाऊन मिळते. या नदीची लांबी १२२ किलोमीटर आहे. या नदीवर मोहने बंधारा आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून महापालिका पाणी उचलते. तर, एमआयडीसीच्या जांभूळ केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. उल्हास पंपिंग हाउस शहाडनजीक आहे. बदलापूर येथे विनादरवाजा पाणबुडी पद्धतीचे लहानसे बॅरेज धरण आहे. ठाण्याची स्टेम पाणीपुरवठा योजनाही या नदीवर आहे. मात्र, ४८ लाख लोकांची तहान भागविणारी ही नदी प्रदूषित होत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण येथे नदी प्रदूषित होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून ‘वनशक्ती’ पर्यावरण संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे. तसेच नदी प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही न्यायप्रविष्ट आहे.नदी वाचवण्यासाठी वर्षभरापासून उल्हास नदी बचाव समिती काम करत आहे. समितीचे सदस्य रवींद्र लिंगायत म्हणाले की, नदी वाचवण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना कल्याण उपकेंद्रात निवेदन दिले होते. विद्यापीठाने समुद्राविषयी (ओशोनोग्राफी) अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यात उल्हास नदी संशोधनाचा प्रकल्प विद्यापीठाने हाती घ्यावा, असे आम्ही सुचविले होते.उल्हास नदीत पूर्वी पाला नावाचा मासा मिळत होता. मात्र, आता तो दुर्मीळ झाला आहे. या नदीतील जैवविविधता अभ्यासली गेली पाहिजे. बदलापूर येथे नदीला एका कातळाने काप दिला आहे. तेथे नदी चक्क काटकोनी वळण घेते. जगातील कोणत्याच नदीला काटकोनी वळण नाही. नदीच्या पाण्यात काही रासायनिक घटक असून, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे.विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रातील ओशोनोग्राफी अभ्यास शाखेने नदीचे संशोधन केल्यास हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरेल, असा दावा समितीने केला आहे. समितीच्या पाठपुराव्याच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने कळविले की, हा पर्याय चांगला असून, त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. त्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, समितीला विद्यापीठाच्या अंतिम होकाराची प्रतीक्षा आहे.दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्था पाठपुरावा करीत आहेत. या संस्थांकडे पैशांचे पाठबळ नाही. सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी प्रदूषित करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांना काडीमात्र चाप बसत नाही. नदी संवर्धनासाठी नियंत्रण मंडळाचा पुढाकार नाही. केंद्राकडून नदी प्रदूषणासाठी जाहीर होणारे पॅकेज उत्तरेकडील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी खर्च केले जाते. त्या पॅकेजचा पैसा महाराष्ट्रातील नद्यांच्या सुधारणांसाठी येतच नाही.आश्वासन हवेतच विरलेउल्हासनगरातील चांदीबाई मनसुखानी कॉलेजने १० वर्षांपूर्वी सर्वाधिक प्रदूषित असलेल्या वालधुनी नदीचा ‘सेव्ह गुड अर्थ’ या नावाने अभ्यास अहवाल तयार केला होता. तो विद्यापीठासह सरकारदरबारी सादर केला होता. तेव्हा तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी वालधुनीचे पाणी उल्हास नदीला जाऊन मिळते, ते रोखण्याचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी एक जाळे तयार केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ती घोषणा हवेत विरली आहे.