शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी संशोधनासाठी विद्यापीठाचा तत्त्वत: होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:37 IST

नदी बचाव कृती समितीचा पाठपुरावा; जैवविविधतेचा अभ्यास होण्याची गरज, आता प्रतीक्षा अंतिम होकाराची

- मुरलीधर भवार कल्याण : ठाणे जिल्ह्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी ४८ लाख नागरिकांची तहान भागविते. ती राजमाचीपासून ते कल्याण खाडीपर्यंत नदीच्या किनारी असलेली शेती व निसर्ग फुलवते. त्यामुळे उल्हास नदीचे संशोधन केले जावे, अशी मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने राज्यपाल व मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली होती. त्यानुसार, नदीच्या संशोधनासाठी विद्यापीठ प्रशासनाने तत्त्वत: होकार दिला आहे. याविषयी बैठक घेऊन त्याचा निर्णय लवकर घेतला जाईल, असे समितीला कळविले आहे.राजमाचीच्या डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी कल्याण खाडीला येऊन मिळते. पुढे ती समुद्राला जाऊन मिळते. या नदीची लांबी १२२ किलोमीटर आहे. या नदीवर मोहने बंधारा आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून महापालिका पाणी उचलते. तर, एमआयडीसीच्या जांभूळ केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. उल्हास पंपिंग हाउस शहाडनजीक आहे. बदलापूर येथे विनादरवाजा पाणबुडी पद्धतीचे लहानसे बॅरेज धरण आहे. ठाण्याची स्टेम पाणीपुरवठा योजनाही या नदीवर आहे. मात्र, ४८ लाख लोकांची तहान भागविणारी ही नदी प्रदूषित होत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण येथे नदी प्रदूषित होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून ‘वनशक्ती’ पर्यावरण संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे. तसेच नदी प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही न्यायप्रविष्ट आहे.नदी वाचवण्यासाठी वर्षभरापासून उल्हास नदी बचाव समिती काम करत आहे. समितीचे सदस्य रवींद्र लिंगायत म्हणाले की, नदी वाचवण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना कल्याण उपकेंद्रात निवेदन दिले होते. विद्यापीठाने समुद्राविषयी (ओशोनोग्राफी) अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यात उल्हास नदी संशोधनाचा प्रकल्प विद्यापीठाने हाती घ्यावा, असे आम्ही सुचविले होते.उल्हास नदीत पूर्वी पाला नावाचा मासा मिळत होता. मात्र, आता तो दुर्मीळ झाला आहे. या नदीतील जैवविविधता अभ्यासली गेली पाहिजे. बदलापूर येथे नदीला एका कातळाने काप दिला आहे. तेथे नदी चक्क काटकोनी वळण घेते. जगातील कोणत्याच नदीला काटकोनी वळण नाही. नदीच्या पाण्यात काही रासायनिक घटक असून, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे.विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रातील ओशोनोग्राफी अभ्यास शाखेने नदीचे संशोधन केल्यास हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरेल, असा दावा समितीने केला आहे. समितीच्या पाठपुराव्याच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने कळविले की, हा पर्याय चांगला असून, त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. त्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, समितीला विद्यापीठाच्या अंतिम होकाराची प्रतीक्षा आहे.दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्था पाठपुरावा करीत आहेत. या संस्थांकडे पैशांचे पाठबळ नाही. सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी प्रदूषित करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांना काडीमात्र चाप बसत नाही. नदी संवर्धनासाठी नियंत्रण मंडळाचा पुढाकार नाही. केंद्राकडून नदी प्रदूषणासाठी जाहीर होणारे पॅकेज उत्तरेकडील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी खर्च केले जाते. त्या पॅकेजचा पैसा महाराष्ट्रातील नद्यांच्या सुधारणांसाठी येतच नाही.आश्वासन हवेतच विरलेउल्हासनगरातील चांदीबाई मनसुखानी कॉलेजने १० वर्षांपूर्वी सर्वाधिक प्रदूषित असलेल्या वालधुनी नदीचा ‘सेव्ह गुड अर्थ’ या नावाने अभ्यास अहवाल तयार केला होता. तो विद्यापीठासह सरकारदरबारी सादर केला होता. तेव्हा तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी वालधुनीचे पाणी उल्हास नदीला जाऊन मिळते, ते रोखण्याचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी एक जाळे तयार केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ती घोषणा हवेत विरली आहे.