शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीचे प्रदूषण पाच वर्षांनंतरही जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:24 IST

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालानुसार नदीकिनाऱ्याची सर्वाधिक प्रदूषित शहरे जाहीर झाली असून, त्यात कल्याण आहे

मुरलीधर भवार  कल्याण : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालानुसार नदीकिनाऱ्याची सर्वाधिक प्रदूषित शहरे जाहीर झाली असून, त्यात कल्याण आहे. तसेच देशातील सर्वाधिक ४९ प्रदूषित नद्यांमध्ये उल्हास नदी आहे. बारमाही वाहणाºया या नदीच्या पाण्यावर ४८ लाख लोकांची तहान भागवली जाते. असे असतानाही या नदीचे प्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून येते. हे प्रदूषण न रोखल्यास भविष्यात नागरिकांना प्यायला पाणी मिळणार नाही. इतक्या लोकांची तहान भागवणारी दुसरी नदी कोणती असेल, तर याचे उत्तरही सरकारकडे नाही.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यापूर्वी २०१४ मध्ये प्रदूषित नद्यांची यादी जाहीर केली होती. त्यातील ४२ नद्यांमध्ये महाराष्ट्रातील २८ आणि त्यात उल्हास नदी होती. त्यानंतरही नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली नाहीत. देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी ९२० कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी किती निधी महाराष्ट्रातील नद्यांसाठी मिळाला, याबाबत कोणतीच सुस्पष्टता नाही.२०१४ नंतर उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणतेच प्रयत्न सरकारी पातळीवर न झाल्याने ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ हा प्रकल्प हाती घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाºयांवर कारवाई केली नाही. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे काम त्यांच्या हाती नसल्याचे सांगत हात वर केले. ‘वनशक्ती’ने राष्ट्रीय हरित लवादाकडे २०१३ मध्ये याचिका दाखल केली. त्यात रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सांडपाण्याचे प्रकल्प पुरेशा प्रमाणात उभारलेले नसल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, सरकारने मे २०१७ अखेर सांडपाणी प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्था उभारतील. त्यामुळे सांडपाणी नदीत सोडले जाणार नाही. हे प्रकल्प उभारण्यासाठी अमृत योजनेंतर्गत उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ पालिकांना मलनि:सारण प्रकल्पाकरिता निधी मंजूर केला आहे. लवादाच्या मागणीनुसार कालबद्ध कार्यक्रम व आराखडा दिला गेला. तरी, त्याची अंमलबजावणी पुढे होत नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांवर पर्यावरणवाद्यांची टीका होत आहे.जलपर्णीचा विळखा कायमनदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यावर जलपर्णी मोठ्या प्रमाणात उगवते. ही जलपर्णी पाणी शोषून घेते. तसेच हे पाणी पिल्यावर त्यापासून कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांची केरळमधून कन्व्हेअर बेल्ट मशीन आणली जाणार होती. ती वर्ष झाले तरी अद्याप येतेच आहे. नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची मानसिकता महापालिका व पालिकांची नाही. नदीपात्रातून दररोज विविध ग्राहक संस्था पाणी उचलतात. नदी स्वच्छ करण्याकडे त्यांचा कानाडोळा असतो. काश्मीर येथील काही सरोवरांत कचरा काढण्याच्या यंत्रणा आहेत. त्या धर्तीवर उल्हास नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.