शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

उल्हास नदीवरील पूल झाला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:17 IST

वांगणीहून कारावगावाकडे रस्ता : फलक लावूनही वाहतूक सुरू, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

बदलापूर : वांगणी स्टेशनवरून पुढे वांगणी गावातून काराव व पुढील अन्य गावांकडे जाताना वाटेत उल्हास नदीवर असलेला पूल १९९८-९९ दरम्यान अंबरनाथचे तत्कालीन आमदार व मंत्री साबीर शेख यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला होता. हा पूल आता मोडकळीस आला आहे. राज्य सरकारच्या बांधकाम खात्यानेच तो धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढून तसे फलक काही महिन्यांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावलेले आहेत.

हा पूल अरुंद असून एकाचवेळी समोरासमोरून येणाऱ्या चारचाकी व अन्य वाहनांच्या चालकांना वाहने खूपच खबरदारीने चालवावी लागतात. सरकारने पूल धोकादायक असल्याचे जाहीर करूनही व त्यावरून अवजड वाहनांना जाण्यास मनाई करणारे फलक सात ते आठ महिन्यांपूर्वी लावले. पण, आजही या धोकादायक पुलावरून अगदी सहाचाकी ट्रक्स, कॉलेजला विद्यार्थ्यांची नेआण करणाºया बस, इतर चारचाकी खासगी वाहने, रिक्षा, दुचाकी वाहने सर्रास नेली जातात. वांगणीहून काराव व आजूबाजूच्या व पुढील गावांना जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर अन्य रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे लोक जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत.

सरकारनेच धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या या पुलावर केव्हाही दुर्घटना घडू शकते, याकडे संबंधित खाते, प्रशासन, ग्रामस्थ, प्रवास करणारे अन्य सर्वच डोळेझाक करत आहेत. या पुलावरून अहोरात्र सर्रास अवजड व अन्य वाहने चालवली जातात. प्रशासनाने तातडीने ही वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे.

पर्यायी पूल बांधण्याची मागणीउल्हास नदीवरील या पुलाला पर्यायी मोठा व रुंद पूल बांधण्यात यावा, तोपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, वांगणी- काराव रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी वांगणी, काराव व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वांगणी-काराव रस्त्याची दुरवस्थावांगणी स्टेशन, गाव येथून काराव गावाला जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा व सर्व चारचाकी वाहने जातात व मोठी वाहतूक दिवसरात्र होत असते. हा रस्ता मोठ्या चढउतारांचा, खड्डे व खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्याचे रूंदीकरण, काँक्रिटीकरण होण्याची आवश्यकता आहे.