शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

उल्हास नदीवरील पूल झाला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:17 IST

वांगणीहून कारावगावाकडे रस्ता : फलक लावूनही वाहतूक सुरू, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

बदलापूर : वांगणी स्टेशनवरून पुढे वांगणी गावातून काराव व पुढील अन्य गावांकडे जाताना वाटेत उल्हास नदीवर असलेला पूल १९९८-९९ दरम्यान अंबरनाथचे तत्कालीन आमदार व मंत्री साबीर शेख यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला होता. हा पूल आता मोडकळीस आला आहे. राज्य सरकारच्या बांधकाम खात्यानेच तो धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढून तसे फलक काही महिन्यांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावलेले आहेत.

हा पूल अरुंद असून एकाचवेळी समोरासमोरून येणाऱ्या चारचाकी व अन्य वाहनांच्या चालकांना वाहने खूपच खबरदारीने चालवावी लागतात. सरकारने पूल धोकादायक असल्याचे जाहीर करूनही व त्यावरून अवजड वाहनांना जाण्यास मनाई करणारे फलक सात ते आठ महिन्यांपूर्वी लावले. पण, आजही या धोकादायक पुलावरून अगदी सहाचाकी ट्रक्स, कॉलेजला विद्यार्थ्यांची नेआण करणाºया बस, इतर चारचाकी खासगी वाहने, रिक्षा, दुचाकी वाहने सर्रास नेली जातात. वांगणीहून काराव व आजूबाजूच्या व पुढील गावांना जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर अन्य रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे लोक जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत.

सरकारनेच धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या या पुलावर केव्हाही दुर्घटना घडू शकते, याकडे संबंधित खाते, प्रशासन, ग्रामस्थ, प्रवास करणारे अन्य सर्वच डोळेझाक करत आहेत. या पुलावरून अहोरात्र सर्रास अवजड व अन्य वाहने चालवली जातात. प्रशासनाने तातडीने ही वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे.

पर्यायी पूल बांधण्याची मागणीउल्हास नदीवरील या पुलाला पर्यायी मोठा व रुंद पूल बांधण्यात यावा, तोपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, वांगणी- काराव रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी वांगणी, काराव व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वांगणी-काराव रस्त्याची दुरवस्थावांगणी स्टेशन, गाव येथून काराव गावाला जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा व सर्व चारचाकी वाहने जातात व मोठी वाहतूक दिवसरात्र होत असते. हा रस्ता मोठ्या चढउतारांचा, खड्डे व खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्याचे रूंदीकरण, काँक्रिटीकरण होण्याची आवश्यकता आहे.