शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

अंबरनाथमध्ये नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहून अनेकांचा 'यू टर्न'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये विनामास्क फिरणाऱ्या आणि गाडीची कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात येते आहे. मात्र ...

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये विनामास्क फिरणाऱ्या आणि गाडीची कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात येते आहे. मात्र या नाकाबंदीला काही वाहनचालक चकवा देत आहेत. पोलिसांना पाहून थेट हे वाहनचालक गाडी युटर्न घेऊन पळून जातात, मात्र अशा पळून जाणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

अंबरनाथमध्ये कोरोना संपल्याच्या अविर्भावात मास्कही न लावता अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे या कोरोना पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कंबर कसली आहे. अंबरनाथ शहराच्या विविध भागात सध्या पोलीस कधीही अचानकपणे नाकाबंदी लावतात. या नाकाबंदीत गाडीची कागदपत्रे तपासणीसोबतच मास्क न घातलेल्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाते. अंबरनाथच्या हुतात्मा चौकात दररोज मोठा फौजफाटा घेऊन ही नाकाबंदी लावली जाते. नाकाबंदी लागलेली पाहून ज्यांनी मास्क लावलेला नसतो, असे वाहनचालक दुरूनच पोलिसांना चकवा देत यू टर्न मारतात. मात्र जे लोक मास्क घालून पुढे जातात, ते कागदपत्रांच्या कचाट्यात अडकतात. पोलिसांच्या कचाट्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि मगच त्यांना सोडले जाते. काहीवेळाने पोलीस कर्मचारी तिथून निघून जातात. तर पोलिसांना चकवा दिलेल्यांच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच आनंद असतो.