शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

खासगी करवसुली कंत्राटावरून भिवंडीच्या महापौरांचा यू-टर्न; महासभेत फक्त झाली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:05 IST

महासभेत फक्त झाली चर्चा : ठराव झाला नसल्याचा दावा

भिवंडी : पालिकेच्या महासभेत घर, पाणीपट्टी वसुलीसाठी कंत्राटदार नेमण्याचा ठराव मंजूर झाल्यावर त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह विविध संघटनांनी विरोध केला. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या प्रश्नी बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासन दखल घेत नसल्याने त्यांनी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देताच, महापौर प्रतिभा पाटील यांनी गुरुवारी उपोषणकर्त्यांना चर्चेला बोलावले. तहकूब महासभेत कंत्राटाची केवळ चर्चा झाली. त्या संदर्भातील ठराव मंजूर झाला नसल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले.

महापालिकेच्या १६ डिसेंबर रोजी झालेल्या तहकूब महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव मागे घेण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कांबळे यांनी २८ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. कांबळे यांच्यासह सात महिला उपोषणात सहभाग घेतला होता. कांबळे यांनी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देताच महापौरांनी त्यांना बोलावले.

आंदोलनकर्त्या महिलांनी महापौरांना प्रश्न विचारला की, जर ठराव मंजूर केला नाही, तर मग आम्ही मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलो आहोत. त्यावेळेस आपण का सांगितले नाही वा आतापर्यंत ज्या पक्ष, संघटना व संस्था यांनी या ठरावाला विरोध केला असता, त्या संदर्भात मनपा प्रशासनाने अधिकृत भूमिका का स्पष्ट केली नाही. अशी प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्यावर महापौरांनी प्रतिक्रिया देणे टाळले, असे कांबळे यांनी सांगितले.

महापौरांनी केवळ ठरावावर चर्चा झाली, असे आश्वासन महापौरांनी दिल्याने आपण उपोषण मागे घेतले, असे कांबळे म्हणाल्या. जर नागरिक आणि आम्हाला अंधारात ठेऊन हा ठराव मंजूर केला, तर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला.

आयुक्तांशी होऊ शकला नाही संपर्क

अखेर गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या विनंतीवरून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा सुरेखा पाटकर यांनी आंदोलनकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी होऊ शकला नाही.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी