शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इमारतीच्या टेरेसवर विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजन्सी प्लाझा इमारतीच्या टेरेसवर काम करणाऱ्या दोन कामगारांना बुधवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजन्सी प्लाझा इमारतीच्या टेरेसवर काम करणाऱ्या दोन कामगारांना बुधवारी रात्री ८ च्या दरम्यान विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन विभागाने दोन्ही मृतदेह काढून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

उल्हासनगर, शांतीनगर येथील रिजन्सी प्लाझा इमारतीच्या टेरेसवर, इमारतीमध्ये काम करणारे कामगार विवेक सिंग व रामनारायण पंडित हे दोघे भरपावसात काम करीत होते. यावेळी इमारतीच्या भिंतीलगत जाणाऱ्या उघड्या विद्युतवाहिनीतून विजेचा धक्का दोघांना बसला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. इमारतीमधील नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यावर, त्यांनी वीजपुरवठा खंडित करून दोघांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. मध्यवर्ती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. मृत कामगारांच्या नातेवाइकांचा शोध पोलीस घेत असून रिजन्सी प्लाझा इमारत व्यवस्थापनासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.