शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

जव्हारच्या दोन गावांना आता शुद्ध पाण्याचा ‘अमृतकलश’

By admin | Updated: January 12, 2016 00:32 IST

शहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे.

- अजित मांडके,  ठाणेशहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, जव्हार तालुक्यातील चौक आणि जंगलपाडा गावातील ३०० घरांना आता २४ तास शुद्ध पाण्याची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अमृतकलश या योजनेच्या माध्यमातून येथील गावात ५ आणि ३ हजार लीटरच्या दोन टाक्या बसविल्या असून त्यातून येथील प्रत्येक कुटुंबाला अवघ्या दोन रुपयांत रोज २० लीटर शुद्ध पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामसभेने ठराव करूनच रोज दोन रुपये देण्याचे निश्चित केले आहे.ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना आजही शुद्ध पाणी मिळत नसल्याने विहिरी, बोअरवेल अथवा झऱ्यांच्या पाण्यातून आपली पाण्याची तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे हागवण, डायरिया, उलट्या असे अनेक आजार येथील रहिवाशांना होत आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण हे अधिक आहे. परंतु, आता काही व्यावसायिक संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक संस्थांच्या मदतीने अशा ग्रामीण भागांना २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, जव्हार तालुक्यातील चौक आणि जंगलपाडा या गावांतील ३०० घरांना अमृतकलशच्या माध्यमातून २४ तास शुद्ध पाणी मिळणार आहे.या योजनेचा शुभारंभ आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यावसायिक संस्थेचे प्रमुख रवी राजपुरोहित आणि विजय भैलुमे यांच्यासह आमदार रूपेश म्हात्रे, कैलास लिंगायत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.असे मिळणार शुद्ध पाणी...येथील बोअरवेलमधील पाणी उचलले जाऊन ते जलशुद्धीकरण केंद्रात सोडले जात आहे. त्यानंतर, त्यावर प्रक्रिया करून ते येथील टाकीत सोडण्यात येत आहे. त्यानंतर, प्रत्येक कुटुंबाला दिलेले एटीएमकार्ड स्वॅप केल्यानंंतर प्रत्येक दिवसाला २० लीटर शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. दरदिवशी २ रुपये मोजावे लागणारया योजनेची देखभाल आणि दुरुस्ती ही गावातील मंडळीकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे या दुरुस्तीचा खर्च निघावा म्हणून दरदिवशी प्रत्येक घराला दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनीदेखील त्याला मंजुरी दिल्याने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे अगदी माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध झाले असून मुंबई, ठाण्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.