शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘त्या’ दोन बहिणींच्या आत्महत्येचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:49 IST

सागर्लीतील इंद्राबाई कांबळे (५०) आणि लकावा कांबळे (४५) या दोघा बहिणींनी तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे

आकाश गायकवाड,  डोंबिवलीसागर्लीतील इंद्राबाई कांबळे (५०) आणि लकावा कांबळे (४५) या दोघा बहिणींनी तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पोलीस व त्यांचा भाऊही बुचकळ्यात पडला आहे. दरम्यान, चार दिवसांत त्यांच्या घरी नातेवाईक तसेच कोणीच कसे फिरकले नाही, याचा पोलीस शोध घेत आहेत.सागर्ली गावातील शंभू गावदेवीनगर चाळीत कांबळे कुटुंबीय पूर्वी राहत होते. रामा कांबळे हे त्यांची पत्नी लक्ष्मी, मोठी मुलगी इंद्राबाई, लकावा व लहान भाऊ लखाप्पा यांच्यासह राहत होते. ते कल्याण-डोंबिवली महापालिकेत कामाला होते. लखाप्पा हा १० वर्षांचा असताना लक्ष्मी यांचे निधन झाले. त्यामुळे रामा यांच्यावर घरातील सर्व जबाबदारी पडली. २००४ मध्ये त्यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी इंद्राबाई व लकावा यांनी स्वीकारली. लखाप्पा लहान असल्याने दोघा बहिणींनी स्वत: शाळेत न जाता घरकाम करून त्याला वाढवले. त्याला नववीपर्यंत शिकवले. त्यामुळे बहिणींनी विवाहही केला नाही. लखाप्पा मोठा झाल्यावर टेम्पोचालक म्हणून काम करून बहिणींना मदत करू लागला. बहिणींनी २००५ मध्ये त्याचा सुषमाशी विवाह लावून दिला. तसेच त्यांनी त्याला श्री समर्थ कृपा बिल्डिंगमध्ये भाड्याने घर घेऊन दिले. त्या स्वत:च्या जानकी दत्तू अपार्टमेंटमध्ये वेगळ्या राहू लागल्या. त्या धुणीभांडी करून स्वत:चे पोट भरत होत्या. तसेच भावाच्या संसारालाही गरज भासेल, तेव्हा हातभार लावत होत्या.लखाप्पाला विनय नावाचा मुलगा आहे. त्या त्याचेही खूप लाड करीत होत्या. लखाप्पा त्यांच्याकडे दोन-तीन दिवस जाऊनयेऊन असायचा. बहिणीही भाऊ, भावजय व भाच्याला नेहमी भेटत असत. मागील आठवड्यात लखाप्पा त्यांच्याकडे जाऊन नाश्ता करून आला होता.