शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

कल्याण ग्रामीणमध्ये हवीत आणखी दोन पोलीस ठाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहर लगतच्या व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरात मागील काही वर्षांत ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहर लगतच्या व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरात मागील काही वर्षांत वेगाने नागरीकरण होत आहे. या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी मानपाडा पोलीस ठाण्यावर आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील मानपाडा पोलीस ठाणे ते शिळफाटा हद्दीत मोठ्या प्रमाणात बार रेस्टॉरंट आहेत. तसेच नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे येथे मजूरही देशातील विविध भागातून येत आहेत. एकूणच या पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने कायदा सुव्यस्थेवरही ताण पडत आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून काटई व दिवा या दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी, अशी मागणी पोलीस प्रशासन व राजकीय नेते मंडळी करत आहेत.

डोंबिवली व परिसराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांच्या आसपास आहे. डोंबिवलीत पश्चिमेला विष्णूनगर, तर पूर्वेला टिळकनगर, रामनगर, मानपाडा अशी ही चार पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांपैकी मानपाडा पोलीस ठाण्याचा पसारा मोठा आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी संकुल, एमआयडीसीतील कंपन्या, निवासी विभाग, हॉटेल व्यवसाय, गाड्यांचे गॅरेज, अन्य छोटे मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. परिणामी तेथील कर्मचाऱ्यांवर तुलनेने कामाचा ताण अधिक आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे विभाजन व्हावे अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखली जावी, यासाठी वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस ठाणी वाढवणे गरजेचे असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

----------------------

दिवा, काटई या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे असावेत, अशी मागणी मी सातत्याने अधिवेशन कार्यकाळात केली होती. त्यानुसार दिवा येथे स्वतंत्र पोलीस चौकी लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता तत्काळ होणे गरजेचे आहे.

- सुभाष भोईर, माजी आमदार

------------

दोन्ही अधिवेशन काळात आणि सातत्याने मी काटई, दिवा, दावडी या ठिकाणी पोलीस ठाणे, हवे अशी मागणी मी केली आहे. या ठिकाणी मानपाडा आणि डायघर ही दोन पोलीस ठाणे सध्या येतात. पण त्या दोन्ही पोलीस ठाण्यात सुमारे सात किलोमीटरचे अंतर आहे. तर, उल्हासनगर दिशेने १४ किलोमीटरवर पोलीस ठाणे आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची गरज आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण

-------------------