शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

कल्याण ग्रामीणमध्ये हवीत आणखी दोन पोलीस ठाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहर लगतच्या व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरात मागील काही वर्षांत ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहर लगतच्या व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरात मागील काही वर्षांत वेगाने नागरीकरण होत आहे. या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी मानपाडा पोलीस ठाण्यावर आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील मानपाडा पोलीस ठाणे ते शिळफाटा हद्दीत मोठ्या प्रमाणात बार रेस्टॉरंट आहेत. तसेच नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे येथे मजूरही देशातील विविध भागातून येत आहेत. एकूणच या पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने कायदा सुव्यस्थेवरही ताण पडत आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून काटई व दिवा या दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी, अशी मागणी पोलीस प्रशासन व राजकीय नेते मंडळी करत आहेत.

डोंबिवली व परिसराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांच्या आसपास आहे. डोंबिवलीत पश्चिमेला विष्णूनगर, तर पूर्वेला टिळकनगर, रामनगर, मानपाडा अशी ही चार पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांपैकी मानपाडा पोलीस ठाण्याचा पसारा मोठा आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी संकुल, एमआयडीसीतील कंपन्या, निवासी विभाग, हॉटेल व्यवसाय, गाड्यांचे गॅरेज, अन्य छोटे मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. परिणामी तेथील कर्मचाऱ्यांवर तुलनेने कामाचा ताण अधिक आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे विभाजन व्हावे अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखली जावी, यासाठी वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस ठाणी वाढवणे गरजेचे असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

----------------------

दिवा, काटई या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे असावेत, अशी मागणी मी सातत्याने अधिवेशन कार्यकाळात केली होती. त्यानुसार दिवा येथे स्वतंत्र पोलीस चौकी लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता तत्काळ होणे गरजेचे आहे.

- सुभाष भोईर, माजी आमदार

------------

दोन्ही अधिवेशन काळात आणि सातत्याने मी काटई, दिवा, दावडी या ठिकाणी पोलीस ठाणे, हवे अशी मागणी मी केली आहे. या ठिकाणी मानपाडा आणि डायघर ही दोन पोलीस ठाणे सध्या येतात. पण त्या दोन्ही पोलीस ठाण्यात सुमारे सात किलोमीटरचे अंतर आहे. तर, उल्हासनगर दिशेने १४ किलोमीटरवर पोलीस ठाणे आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची गरज आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण

-------------------