शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

दोन महिन्यांत ठाण्यात दीड हजार जणांना श्वानदंश

By admin | Updated: June 19, 2017 04:58 IST

ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भटक्या श्वानांची दहशत वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात तब्बल ८०२, तर मे महिन्यात ७०२ जणांना श्वानदंश झाला असून सरासरी दिवसाला २५ जणांचे श्वानांनी लचके तोडल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस भटक्या श्वानांची समस्या बिकट होत चालली आहे. त्यातच शहराचा वाढता विस्तार आणि जागोजागी होणारा कचरा तसेच गल्लीबोळातील चायनीज गाड्यांमुळे श्वानांना खाण्यास मिळत आहे. तसेच श्वानांमुळे अस्वच्छता पसरू लागली आहे. त्यातून भटके श्वान मोटारसायकलवरून येजा करणाऱ्यांचा पाठलाग करताना शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. या श्वानांमुळे चावा घेतल्याने जखमी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दरम्यान, २०१५ या वर्षभरात ६ हजार ७२२ जणांना श्वानदंश झाला आहे. त्या वर्षातील डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ७९९ जणांना श्वानदंश झाला होता. त्यापाठोपाठ मार्च ६९४, नोव्हेंबर ६३३ आणि जानेवारी ६३० जणांना श्वानदंश झाल्याचे समोर आले आहे. तसेच २०१६ या वर्षात जानेवारीत सर्वाधिक १ हजार ४८१ जणांना तसेच फेब्रुवारी ते मे महिन्यात सरासरी ५०० जणांना श्वानदंश झाला आहे. जूनमध्ये ४११, तर जुलै महिन्यात २३३ जणांना श्वानांनी आपले लक्ष्य केले होते. त्यानुसार, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत तब्बल दोन हजार १५५ जणांचे श्वानांनी लचके तोडले आहेत. एप्रिल २०१७ या एका महिन्यात ८०२, तर मे महिन्यात ७२७ जणांना श्वानांनी दंश केल्याची नोंद ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली.