शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दोन महिन्यांत ठाण्यात दीड हजार जणांना श्वानदंश

By admin | Updated: June 19, 2017 04:58 IST

ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भटक्या श्वानांची दहशत वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात तब्बल ८०२, तर मे महिन्यात ७०२ जणांना श्वानदंश झाला असून सरासरी दिवसाला २५ जणांचे श्वानांनी लचके तोडल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस भटक्या श्वानांची समस्या बिकट होत चालली आहे. त्यातच शहराचा वाढता विस्तार आणि जागोजागी होणारा कचरा तसेच गल्लीबोळातील चायनीज गाड्यांमुळे श्वानांना खाण्यास मिळत आहे. तसेच श्वानांमुळे अस्वच्छता पसरू लागली आहे. त्यातून भटके श्वान मोटारसायकलवरून येजा करणाऱ्यांचा पाठलाग करताना शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. या श्वानांमुळे चावा घेतल्याने जखमी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दरम्यान, २०१५ या वर्षभरात ६ हजार ७२२ जणांना श्वानदंश झाला आहे. त्या वर्षातील डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ७९९ जणांना श्वानदंश झाला होता. त्यापाठोपाठ मार्च ६९४, नोव्हेंबर ६३३ आणि जानेवारी ६३० जणांना श्वानदंश झाल्याचे समोर आले आहे. तसेच २०१६ या वर्षात जानेवारीत सर्वाधिक १ हजार ४८१ जणांना तसेच फेब्रुवारी ते मे महिन्यात सरासरी ५०० जणांना श्वानदंश झाला आहे. जूनमध्ये ४११, तर जुलै महिन्यात २३३ जणांना श्वानांनी आपले लक्ष्य केले होते. त्यानुसार, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत तब्बल दोन हजार १५५ जणांचे श्वानांनी लचके तोडले आहेत. एप्रिल २०१७ या एका महिन्यात ८०२, तर मे महिन्यात ७२७ जणांना श्वानांनी दंश केल्याची नोंद ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली.