शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ठाण्यात दोघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता

By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:36 IST

मुसळधार पावसामुळे शाेधकार्यात अडथळे

ठाणे :ठाणे शहरात दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये दाेघे जण बुडाले. पहिल्या घटनेत कळवा, पारसिक नगरमधील चिराग जोशी (१९) या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला तर दुसऱ्या घटनेत कळव्यातील शांतीनगर भागातील दोसा (३२) ही व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. चिराग हा मित्रांसोबत पोहण्यासाठी आणि दोसा हा मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेला असताना दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवली.

चिराग हा बुधवारी सायंकाळी त्याचा भाऊ आणि तीन ते चार मित्रांसोबत ओवळ्यातील पानखंडा गावातील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने चिराग पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रासह भावाने त्याचा शोध घेतला. परंतु, ताे न मिळाल्याने या दुर्घटनेची माहिती त्यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तत्काळ कासारवडवली पोलिसांसह अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टीडीआरएफ यांनी धाव घेत शोधकार्य सुरू केले. तीन तास शोध घेऊनही चिराग सापडला नाही. गुरुवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास चिरागचा मृतदेह आढळला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कासारवडवली पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दुसऱ्या घटनेत, कळव्यातील शांतीनगर येथील दोसा (३२) हा गुरुवारी सकाळी मित्रांसमवेत रेतीबंदर खाडीकिनारी मासे पकडण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो सकाळी ११:३० च्या सुमारास बुडाला. माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या पथकांनी धाव घेतली. साधारण साडेचार तास शाेध घेऊनही ताे सापडला नाही. याचदरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोधकार्य सायंकाळी ४ वाजता थांबविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :thaneठाणे