शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

दुकानदारांना दिली दोन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:30 IST

कल्याण-बदलापूर रस्ता : आयुक्तांसोबत झाली बैठक

उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाºया दुकानदारांनी पर्यायी जागेसाठी न्यायालयात धाव घेतल्याने हे काम चार वर्षांपासून रखडले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासोबत या दुकानदारांची बैठक झाली. यामध्ये दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणात एक हजार दुकानदार बाधित झाले आहेत. यातील २७ दुकानदार पर्यायी जागेसाठी न्यायालयात गेल्याने चार वर्षांपासून हे काम थांबले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात होत असून अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने न्यायालयात गेलेल्या दुकानदारांच्या अनेकदा बैठका झाल्या. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्यासह महापौर, उपमहापौर यांच्यासोबत व्यापाºयाच्या बैठका घेत मध्यममार्ग काढण्याची विनंती महापालिकेने केली. मात्र, यातून मार्ग न निघाल्याने आयुक्त देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.मध्यंतरी महापौर पंचम कलानी, आमदार ज्योती कलानी यांच्यासह माजी आमदार कुमार आयलानी व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना साकडे घालून रस्त्याच्या पुनर्बांधणीची मागणी केली. महापौर न्यायालयात गेल्याने नवीन विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणाचा आदेश पालिका प्रशासनाला दिला. महापालिकेने रस्तारुंदीकरणाच्या आड येणाºया दुकानदारांना जागा मालकीबाबत पुरावे सादर करण्याचे सांगितले. तसेच, दुकानदारांच्या याचिकेवर एकतर्फी निर्णय देऊ नका. यासाठी विधी विभागाने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. पावसाने विश्रांती घेताच आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेत कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीचे संकेत दिले. यातूनच दुकानदारांसोबत बैेठक घेऊ न शहर विकासाच्या आड न येण्याची विनंती आयुक्तांनी दुकानदारांना केली.रस्त्याप्रकरणी आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसांत निर्णय कळवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा व्यापाऱ्यांना दिल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नवीन डीपीनुसार रुंदीकरण - उपायुक्तकल्याण ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण शहरविकास आराखड्यानुसार होणार आहे. रस्ता सर्वेक्षणाचे काम स्थानिक नगररचनाकार यांना दिले जाणार असून बाधित होणाºया दुकानदारांना मार्किंग व नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. तसेच आयुक्तांनी न्यायालयात गेलेल्या दुकानदारांसोबत चर्चा करून दोन दिवसांत निर्णय कळवण्याचे सांगण्यात आल्याचे उपायुक्त संतोष देहरकरांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका