शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

फायनान्स कंपनीची वाहने परस्पर विकणाऱ्या दोघा भामट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:04 IST

कंपनीच्या वसुली अधिकाºयाचा प्रताप : १७ दुचाकी केल्या हस्तगत

ठाणे : वाहनखरेदीसाठी कर्जपुरवठा करणाºया ठाण्यातील एका वित्तीय संस्थेच्या थकबाकीदारांच्या वाहनांची परस्पर विक्री करणाºया दीपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी दिली.

पाचपाखाडीतील ‘साई पॉइंट’ या वाहनांना कर्जपुरवठा करणाºया कंपनीतून बरीच वाहने बेपत्ता असल्याची तक्रार या कंपनीने नौपाडा पोलिसांकडे केली होती. याच कंपनीचा मुख्य वसुली अधिकारी दीपक रावत यानेच अजगर खान या दलालाच्या मदतीने थकबाकीदारांची वाहने परस्पर आणून ती कंपनीत न ठेवता आपल्याच गोदामात ठेवली. नंतर, त्यांची त्याने विक्रीही केली. अशाच विक्री केलेल्या वाहनांपैकी एकाच्या मालकाने आरटीओ कार्यालयात मोटारसायकलच्या नोंदणीसाठी लागणारा नाहरकत दाखला (एनओसी) साई पॉइंट कंपनीकडे मागितला. परंतु, त्या दुचाकीच्या विक्रीची नोंदच कंपनीत नव्हती. शिवाय, ती वाहने या कंपनीत उपलब्धही नव्हती. त्यामुळे कंपनीचे मालक दिलीप पाटील यांनी इतरही वाहनांची चौकशी केली. तेव्हा अनेक वाहने बेपत्ता असल्याचे आढळले. त्यानंतर याप्रकरणी चौकशीचा अर्ज दोन महिन्यांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात या कंपनीने केला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार अहिरे आदींच्या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेव्हा साई पॉइंटचा कर्मचारी रावत यानेच एका दलालाला हाताशी धरून अनेक वाहनांचा अपहार करून त्यांची ५० हजार ते सव्वा लाखांच्या किमतीमध्ये विक्री केल्याचे आढळले.

हा प्रकार कंपनीच्या मालकाच्या परस्पर झाल्याने त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती. ज्या दुचाकीच्या मालकांनी कर्ज थकवले आहे, त्यांची वाहने ताब्यात घेऊन ती कंपनीच्या काल्हेर, भिवंडीतील गोदामात जमा करण्याचे काम रावतकडे होते. ही वाहने जमा केल्यानंतर त्याची मेलद्वारे माहिती देण्याचे कामही त्याच्याकडे होते. याचाच फायदा घेऊन रावतने अजगर या दलालाच्या मदतीने हप्ते न भरलेल्या मोटारसायकली उचलून त्याची कंपनीला कोणतीही माहिती न देता त्यांची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या वाहनांची रक्कम कंपनीच्या कर्जखात्यामध्ये जमा न करता त्यांनी अपहार केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी ६ जुलै रोजी कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच ७ जुलै रोजी रावत आणि खान या दोघांनाही अटक करण्यात आली.

त्यांनी चोरी करून परस्पर विक्री केलेल्या सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनाही सुरुवातीला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. साई पॉइंटचे सुमारे १२ हजार कर्जदार ग्राहक असून त्यातील चार हजार ग्राहक हे थकबाकीदार आहेत. आतापर्यंत १७ मोटारसायकली मिळाल्या आहेत. आणखी ४० ते ५० मोटारसायकलींची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आणखी मोटारसायकलींची विक्री झाल्याची शक्यता चंद्रकांत जाधव यांनी वर्तविली आहे.नवीन किंवा जुने वाहन खरेदी करण्यापूर्वी त्या वाहनाच्या नोंदीसंदर्भातील कायदेशीर बाबी ग्राहकांनी तपासणे आवश्यक आहेत. ग्राहकांनी सतर्कता ठेवल्यास अशा चोरीच्या वाहनांच्या खरेदीविक्रीला आळा बसू शकतो.- चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नौपाडा पोलीस ठाणे