शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जिवाची मुंबई करण्यासाठी पुण्यातून पळालेली दोन मुले मिळाली ठाण्यात

By जितेंद्र कालेकर | Updated: November 29, 2023 20:34 IST

नौपाडा पोलिसांच्या सर्तकतेमुळे पुन्हा आई वडिलांच्या स्वाधीन

ठाणे: मुंबईची जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया आणि आणखी बरेच काही पाहण्यासाठी पुण्याच्या कात्रज गावातून पळालेली १२ आणि १३ वर्षांची दोन मुले ठाण्याच्या नौपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बुधवारी पुन्हा आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. आपली मुले सुखरुप मिळाल्यामुळे ठाणे पोलिसांचे या पालकांनी आभार मानले आहेत.

पुणे जिल्हयातील कात्रज गावात राहणाऱ्या दोन मित्रांना चित्रपटांमुळे तसेच काही नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीमुळे मुंबई पाहण्याचे वेध लागले होते. परंतू, दोषांनाही आपआपल्या घरातून परवानगी मिळणार नसल्याची कल्पना आल्यामुळे दोघांनीही आपल्या आई वडिलांना काहीच कल्पना न देता घर सोडण्याचे ठरवले. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्याा सुमारास त्यांनी लोणी गावातून पुण्याचे स्वारगेट गाठले. तिथून स्वारगेट - ठाणे एसटी बसने हे दोघेही ठाण्यात रात्रीच्या सुमारास आले.

ठाण्याच्या वंदना बस स्थानकातून २९ नोव्हेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास एका रिक्षा चालकाला त्यांनी मुंबईच्या जुहू चौपाटीवर जायचे असल्याचे सांगितले. त्यांची रिक्षा चालकाबरोबर चर्चा सुरु असतांनाच नौपाडा पोलिस ठाण्याचे बीट मार्शल विनोद पाटील हे गस्त घालतांना तिथे पाेहचले. चौकशीत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या पालकांचा संपर्क क्रमांक घेण्यात आला. तेंव्हा त्यांच्यापैकी एकाच्या आईने ही दोन्ही मुले मंगळवारपासून बेपत्ता झाल्याचे सांगितले. मुलांची ओळख पटल्यानंतर दोघांच्याही पालकांना पोलिसांनी ठाण्यात पाचारण केले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि हवालदार पाटील यांनी या दोन्ही मुलांना दाेघांच्याही वडिलांकडे सुखरुप ताब्यात दिले. विशेष म्हणजे ही दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची कोणतीच तक्रार पुण्याच्या पोलिसांकडेही नव्हती. परंतू, ठाणे पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे आपली मुले सुखरुप परत मिळाल्यामुळे दोघांच्याही पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.