लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्याच नात्यातील सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचे अपहरण करणाऱ्या सुफियाना उर्फ गौरी निसरु ल्लाह उर्फ समिर शेख (२२) आणि तिचा साथीदार विजय गमरे (२२, रा. कापूरबावडी, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या दोन्ही मुलींची सुखरुप सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.वागळे इस्टेट, आंबेवाडी परिसरातील दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी वागळे इस्स्टेट पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२१ रोजी दाखल केली होती. त्या दोघीही ५ जानेवारी रोजी आपल्या घरासमोर खेळत असतांना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रण तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दतात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ, पोलीस हवालदार शिवाजी रावते, पोलीस नाईक सुनिल मोरे, संदीप थोरात, रोहन जाधव, एस. डी. सादये, पोलीस अंमलदार बरले आणि रत्नदीप शेलार आदींनी आरोपींचा शोध घेतला. तेंव्हा ठाण्यातील इंदीरानगर मार्केट परिसरात विजय गमरे घुटमळतांना आढळला. तो निघून जात असतांना या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेंव्हा यातील बेपत्ता दोन्ही मुली त्याच्या समवेत असलेल्या सुफियाना हिच्यासह त्याच परिसरामध्ये एका ठिकाणी असल्याचे सांगितले. या दोन्ही अपहरण झालेल्या मुलींचा अवघ्या १२ तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले. दोघींनाही सुखरुपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विजय आणि सुफियाना यांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली.
दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणी आत्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 23:34 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्याच नात्यातील सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचे अपहरण करणाऱ्या सुफियाना उर्फ गौरी निसरु ...
दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणी आत्यासह दोघांना अटक
ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कामगिरी मुलींची १२ तासांमध्ये सुखरुप सुटका