शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १२ वर्षांनंतर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

ठाणे : कामगार न्यायालय, ठाणे येथे दाखल केलेल्या खटल्यामध्ये पालघर जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविकांना अखेर १२ वर्षांच्या परिश्रमानंतर ...

ठाणे : कामगार न्यायालय, ठाणे येथे दाखल केलेल्या खटल्यामध्ये पालघर जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविकांना अखेर १२ वर्षांच्या परिश्रमानंतर न्याय मिळाला आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्यासह मागील वर्षांची भरपाई मिळवून देण्यात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाला यश मिळाले आहे, असे या संघाचे अध्यक्ष ॲड. एम. ए. पाटील व सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमत सांगितले.

जव्हार प्रकल्प- २ मध्ये कार्यरत यशोदा उदावत व रंजना भोये या अंगणवाडी सेविकांना या प्रकल्प कार्यालयाने मार्च २००७ साली बेकायदेशीररित्या कामावरून कमी केले होते. या प्रकल्पाच्या मनमानी निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने कामगार न्यायालय ठाणे येथे खटला दाखल केला होता. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. या कामगार न्यायालयात संघटनेने सतत पाठपुरावा केल्यामुळे २०१९ साली दोन्ही अंगणवाडी सेविकांना पूर्वपदावर रुजू करण्यासंबंधी कामगार न्यायालयाने आदेश दिला होता.

न्यायालयीन निर्णयासह या दोन्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २००७ पासून मान देण्याचा निर्णय कामगार न्यायालयाने दिला होता. या सेविकांना कामगार न्यायालयाच्या आदेशाने आता मानधनापोटी पाच लाख ६८ हजार ८२ रुपयांची भरपाई रक्कम मिळाली असून त्यांना आता पुन्हा कामावरही घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारात आनंदोत्सव असून या यशासाठी परिश्रम घेतलेल्या या संघटनेचे आभारही या सेविकांनी मानले आहेत.