शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांतील २० टक्के करवाढीचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:15 IST

ठराव रद्द करण्याबाबत राज्य सरकार ढिम्म

कल्याण : केडीएमसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ताधारकांना तीन वर्षे सामान्य करआकारणी व तीन वर्षांनंतर प्रतिवर्षी २० टक्के करवाढीचा ठराव महापालिकेने केला होता. हा ठराव महापालिका अधिनियमाशी विसंगत असल्याने तो रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी जूनमध्ये राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. यावर सरकारने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. हा ठराव रद्द करण्यासाठी आता डोंबिवली औद्योगिक निवासी भागातील नागरिक पाठपुरावा करणार आहेत.महापालिकेत १ जून २०१५ रोजी २७ गावे समाविष्ट करण्यात आली. यापूर्वी या गावांतील ग्रामपंचायतींकडून मालमत्ता करवसुली केली जात होती. ग्रामपंचायतीची कर कमी होता. गावे महापालिकेत आल्यावर नियमानुसार तीन वर्षे सामान्य कर आकारणी केली जाते. त्यानंतर त्या मालमत्ताधारकांना तीन वर्षांनंतर दरवर्षी २० टक्के करवाढ करण्यात यावी, असा ठराव महापालिकेच्या महासभेत मे २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला.२७ गावांतील मालमत्ता करवाढीला युवा मोर्चा, सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि डोंबिवली वेल्फेअर सोसायटीने विरोध केला आहे. ही करवाढ जाचक असून ती रद्द करावी. २७ गावांतील नागरिकांना महापालिका योग्य प्रकारे सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. सोयी-सुविधा न देता करवाढ करणे अयोग्य असल्याचे मत मांडले गेले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही महापालिकेस जाचक करवाढ करण्यात येऊ नये. तूर्तास ती थांबवावी, असे महापालिका प्रशासनास सूचित केले होते. सेवा नाही तर कर नाही हे आंदोलन कल्याणमध्ये करण्यात आले. त्याच धर्तीवर डोंबिवली निवासी भागातील नागरिकांनी करवाढ असलेली मालमत्ता कराची बिले घेणे नाकारले. डोंबिवली औद्योगिक निवासी भाग हा २७ गावांच्या हद्दीत समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांचाही २० टक्के करवाढीस विरोध होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे २० टक्के करवाढीचा महापालिकेने केलेला ठराव हा महापालिका अधिनियमाशी विसंगत असल्याने तो रद्द करण्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. हा ठराव रद्द करण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.पालिकेच्या करसंकलनाला फटका?महापालिकेने २० टक्के करवाढ असलेली मालमत्ता करपट्टीची बिले २७ गावांत वाटप केली आहेत. ही बिले २०१८ वर्षासाठी आहेत. यापूर्वीची बिले ही सामान्य कराची होती. २०१५ पासून महापालिकेस २७ गावांतून मालमत्ता कराची वसुली योग्य प्रकारे झालेली नाही. सरकारकडून २७ गावे समाविष्ट केल्यावर अद्याप महापालिकेस हद्दवाढ अनुदान मिळालेले नाही. करवसुलीचा तिढा लवकर सुटला नाही, तर यंदा २७ गावांतून मालमत्ता कराची वसुली अत्यल्प होऊ शकते. त्याला फटका महापालिकेस बसू शकतो.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका