शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

भाताला बाराशे, नागली, वरई चार हजार; भाव गडगडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:27 IST

- जनार्दन भेरे  लोकमत न्यूज नेटवर्क  भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका ...

- जनार्दन भेरे लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात  तांदूळ, ज्वारी, बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. भाताला  एक हजार ते १२०० रुपये, नागलीला ४ हजार १०० रुपये, तर वरई ४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे.

खरीप हंगामातील भात, नागली, वरई यांना चांगला  भाव मिळत नाही. शेवटी शेतकऱ्यांना अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते. आता हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यात नांगरणीबरोबरच भात बियाण्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या शेतमालाची मागणी बाजारात वाढली आहे. परंतु, आवक घटल्याने मिळेल त्या किमतीला शेतकऱ्यांना भात  विकावा लागत आहे.

भाताला सर्वाधिक भावभाताला सर्वाधिक भाव भात खरेदी केंद्राकडून मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या भात खरेदी करत नसल्याने व शासकीय भात खरेदी केंद्र बंद झाल्याने खासगी दुकानदार आता अधिक कमी भावाने भात खरेदी करू लागले आहेत. भात १ हजार २०० रुपयांना विकला जात आहे.

भाव आणखी गडगडणार     खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे भात भिजल्याने मोठी घट झाली आहे. त्यामुळे  मागणी वाढली आहे. हा भाव हजार रुपये ते तेराशे क्विंटलवर जाऊन स्थिर राहण्याची शक्यता आहे.     खरीप व रब्बी हंगामातील अवकाळी अतिवृष्टीने   उत्पादनात घट झाली. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे आवश्यक भावात वाढ झाली आहे. नवीन भात बाजारात येईपर्यंत भावात चढउतार राहण्याची शक्यता आहे. किंवा अजूनही भाताचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

भाताचे उत्पादन जास्त झालेल्या शेतकऱ्यांनी सध्या भाताची विक्री सुरू केली आहे. सध्या बाजारात भात, नागली, बाजरीची आवक जास्त असल्याचे दिसून येते.    -योगेश सोळंकी, कृषी पर्यवेक्षक.

शेतकऱ्यांनी भाव कमी असल्याने भाताची विक्री करण्याऐवजी बियाणे म्हणून घरात ठेवले आहे.    - प्रवीण भेरे, शेतकरी.