शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भाताला बाराशे, नागली, वरई चार हजार; भाव गडगडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:27 IST

- जनार्दन भेरे  लोकमत न्यूज नेटवर्क  भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका ...

- जनार्दन भेरे लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात  तांदूळ, ज्वारी, बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. भाताला  एक हजार ते १२०० रुपये, नागलीला ४ हजार १०० रुपये, तर वरई ४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे.

खरीप हंगामातील भात, नागली, वरई यांना चांगला  भाव मिळत नाही. शेवटी शेतकऱ्यांना अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते. आता हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यात नांगरणीबरोबरच भात बियाण्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या शेतमालाची मागणी बाजारात वाढली आहे. परंतु, आवक घटल्याने मिळेल त्या किमतीला शेतकऱ्यांना भात  विकावा लागत आहे.

भाताला सर्वाधिक भावभाताला सर्वाधिक भाव भात खरेदी केंद्राकडून मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या भात खरेदी करत नसल्याने व शासकीय भात खरेदी केंद्र बंद झाल्याने खासगी दुकानदार आता अधिक कमी भावाने भात खरेदी करू लागले आहेत. भात १ हजार २०० रुपयांना विकला जात आहे.

भाव आणखी गडगडणार     खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे भात भिजल्याने मोठी घट झाली आहे. त्यामुळे  मागणी वाढली आहे. हा भाव हजार रुपये ते तेराशे क्विंटलवर जाऊन स्थिर राहण्याची शक्यता आहे.     खरीप व रब्बी हंगामातील अवकाळी अतिवृष्टीने   उत्पादनात घट झाली. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे आवश्यक भावात वाढ झाली आहे. नवीन भात बाजारात येईपर्यंत भावात चढउतार राहण्याची शक्यता आहे. किंवा अजूनही भाताचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

भाताचे उत्पादन जास्त झालेल्या शेतकऱ्यांनी सध्या भाताची विक्री सुरू केली आहे. सध्या बाजारात भात, नागली, बाजरीची आवक जास्त असल्याचे दिसून येते.    -योगेश सोळंकी, कृषी पर्यवेक्षक.

शेतकऱ्यांनी भाव कमी असल्याने भाताची विक्री करण्याऐवजी बियाणे म्हणून घरात ठेवले आहे.    - प्रवीण भेरे, शेतकरी.