शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

विद्यार्थ्यांसोबतच आता पालकांचीही घेणार शिकवणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:23 IST

अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही.

- स्नेहा पावसकरठाणे : अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही. त्यासाठी पालक दुप्पट मेहनत करून मुलांना शिकवणीत प्रवेश घेतात. मध्यमवर्गीय पालकांची हीच परवड थांबवण्याच्या दृष्टीने सरस्वती मंदिर ट्रस्टने यंदा शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरस्वती विद्यासंकुलातच विनामूल्य शिकवणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यादृष्टीने पालकांचीही शिकवणी घेतली जाणार आहे.बहुतांशी शाळांमधील सुमारे ९० टक्के विद्यार्थी खाजगी शिकवणीत जातात. अगदी शिशुवर्गातील मुलेही शिकवणीत दिसतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. काही पालकांना योग्य तितके ज्ञान नसते. काहींना मुलांसाठी वेळ नसतो. काहींच्या वस्तीमधील वातावरण अभ्यासाला पोषक नसते, तर इतर मुले जातात म्हणूनही काही पालक मुलांना शिकवणीमध्ये पाठवतात. त्यातच खाजगी शिकवण्यांची फी वर्षागणिक वाढते आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांचे आर्थिक गणित कोलमडते. आपल्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थीसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, हे लक्षात घेत सरस्वती मंदिर ट्रस्टने शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान सुरुवातीला पहिली ते चौथी इयत्तेतील इच्छुक विद्यार्थ्यांची शाळेतील निवडक शिक्षक हे शाळेतच शिकवणी घेणार आहेत. शाळा सुटल्यावर किंवा आठवड्यातून शनिवार-रविवारी हे शिकवणीचे वर्ग घेतले जातील.इच्छुक पालकांनी नाोंदणी केल्यावर जुलै महिन्यापासूनच हे अभियान सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.>घरच्या घरी अभ्यास घेण्याच्या क्लृप्त्या शिकवणारबदलत्या अभ्यासक्रमामुळे काही शिक्षित पालकही मुलांचा घरी अभ्यास घेणे टाळतात. अशा पालकांचीही शाळेत विशेष शिकवणी घेतली जाणार आहे. मुलांचा अभ्यास घरच्या घरी घेण्याच्या काही क्लृप्त्या, नियम त्यांना यादरम्यान समजावून सांगितले जाणार आहे.हे अभियान संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित सहभागातूनच यशस्वी होऊ शकते. पहिल्या टप्प्यातच सगळे विद्यार्थी खाजगी शिकवणीपासून दूर होणार नाहीत. मात्र, शक्य तितक्या जास्त विद्यार्थ्यांना शाळाबाह्यशिकवण्यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे.