शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसोबतच आता पालकांचीही घेणार शिकवणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:23 IST

अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही.

- स्नेहा पावसकरठाणे : अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही. त्यासाठी पालक दुप्पट मेहनत करून मुलांना शिकवणीत प्रवेश घेतात. मध्यमवर्गीय पालकांची हीच परवड थांबवण्याच्या दृष्टीने सरस्वती मंदिर ट्रस्टने यंदा शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरस्वती विद्यासंकुलातच विनामूल्य शिकवणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यादृष्टीने पालकांचीही शिकवणी घेतली जाणार आहे.बहुतांशी शाळांमधील सुमारे ९० टक्के विद्यार्थी खाजगी शिकवणीत जातात. अगदी शिशुवर्गातील मुलेही शिकवणीत दिसतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. काही पालकांना योग्य तितके ज्ञान नसते. काहींना मुलांसाठी वेळ नसतो. काहींच्या वस्तीमधील वातावरण अभ्यासाला पोषक नसते, तर इतर मुले जातात म्हणूनही काही पालक मुलांना शिकवणीमध्ये पाठवतात. त्यातच खाजगी शिकवण्यांची फी वर्षागणिक वाढते आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांचे आर्थिक गणित कोलमडते. आपल्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थीसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, हे लक्षात घेत सरस्वती मंदिर ट्रस्टने शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान सुरुवातीला पहिली ते चौथी इयत्तेतील इच्छुक विद्यार्थ्यांची शाळेतील निवडक शिक्षक हे शाळेतच शिकवणी घेणार आहेत. शाळा सुटल्यावर किंवा आठवड्यातून शनिवार-रविवारी हे शिकवणीचे वर्ग घेतले जातील.इच्छुक पालकांनी नाोंदणी केल्यावर जुलै महिन्यापासूनच हे अभियान सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.>घरच्या घरी अभ्यास घेण्याच्या क्लृप्त्या शिकवणारबदलत्या अभ्यासक्रमामुळे काही शिक्षित पालकही मुलांचा घरी अभ्यास घेणे टाळतात. अशा पालकांचीही शाळेत विशेष शिकवणी घेतली जाणार आहे. मुलांचा अभ्यास घरच्या घरी घेण्याच्या काही क्लृप्त्या, नियम त्यांना यादरम्यान समजावून सांगितले जाणार आहे.हे अभियान संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित सहभागातूनच यशस्वी होऊ शकते. पहिल्या टप्प्यातच सगळे विद्यार्थी खाजगी शिकवणीपासून दूर होणार नाहीत. मात्र, शक्य तितक्या जास्त विद्यार्थ्यांना शाळाबाह्यशिकवण्यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे.