शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा

By admin | Updated: January 25, 2017 04:52 IST

कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे

ठाणे : कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे आमचा टोल कधी बंद होणार याचा ठाणेकरांनी जाब विचारावा, असे जाहीर आवाहन ठाणे जिल्ह्यात टोलबंदीची चळवळ उभी करणाऱ्या ‘टिसा’ आणि ‘टोल विरोधी समिती’ने ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदारांना केले आहे.‘टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा’, अशा शब्दात या समितीने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ठाण्यातील नेत्यांत हिम्मत असेल तर त्यांनी तो बंद करून दाखवावाच, असे समितीने म्हटले आहे. कोल्हापूरकर टोल बंद करून दाखवू शकतात मग ठाण्यातील नेत्यांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीत टोल बंदीबाबत वचन दिल्यानंतरही ठाणे जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे टोलबंदी झालेली नाही. मुंबई-ठाणेकरांचा पिच्छा टोल सोडत नसल्याने आगामी निवडणुकीपूर्वी ‘टोल हटवा, मते मिळावा’अशी व्यापक चळवळ गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील ‘टिसा’ आणि अन्य ५५ संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. दरम्यान, त्याच आशयाचे कार स्टीकर्स, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ तीव्र करण्याचे काम केले गेले आहे.ठाणे शहराच्या प्रवेश व निर्गमननाक्यांवरील टोलनाक्यांमुळे शहरातील जनता, व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील व सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण आहे. तसेच राज्यातील इतर ठिकाणचे टोल याआधीच बंद झाले असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर वसुली अद्यापही सुरू आहे.ठाणे शहरातील नागरिकांना मुंबईतील एकही पूल न वापरता सुद्धा गेली १८ वर्षे टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इतर नाक्यांवर शहरातील ५ कि.मी.च्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या सुविधा सुद्धा इतक्या वर्षात मिळाल्या नाहीत, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)