शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा

By admin | Updated: January 25, 2017 04:52 IST

कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे

ठाणे : कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे आमचा टोल कधी बंद होणार याचा ठाणेकरांनी जाब विचारावा, असे जाहीर आवाहन ठाणे जिल्ह्यात टोलबंदीची चळवळ उभी करणाऱ्या ‘टिसा’ आणि ‘टोल विरोधी समिती’ने ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदारांना केले आहे.‘टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा’, अशा शब्दात या समितीने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ठाण्यातील नेत्यांत हिम्मत असेल तर त्यांनी तो बंद करून दाखवावाच, असे समितीने म्हटले आहे. कोल्हापूरकर टोल बंद करून दाखवू शकतात मग ठाण्यातील नेत्यांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीत टोल बंदीबाबत वचन दिल्यानंतरही ठाणे जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे टोलबंदी झालेली नाही. मुंबई-ठाणेकरांचा पिच्छा टोल सोडत नसल्याने आगामी निवडणुकीपूर्वी ‘टोल हटवा, मते मिळावा’अशी व्यापक चळवळ गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील ‘टिसा’ आणि अन्य ५५ संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. दरम्यान, त्याच आशयाचे कार स्टीकर्स, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ तीव्र करण्याचे काम केले गेले आहे.ठाणे शहराच्या प्रवेश व निर्गमननाक्यांवरील टोलनाक्यांमुळे शहरातील जनता, व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील व सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण आहे. तसेच राज्यातील इतर ठिकाणचे टोल याआधीच बंद झाले असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर वसुली अद्यापही सुरू आहे.ठाणे शहरातील नागरिकांना मुंबईतील एकही पूल न वापरता सुद्धा गेली १८ वर्षे टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इतर नाक्यांवर शहरातील ५ कि.मी.च्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या सुविधा सुद्धा इतक्या वर्षात मिळाल्या नाहीत, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)