शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा

By admin | Updated: January 25, 2017 04:52 IST

कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे

ठाणे : कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे आमचा टोल कधी बंद होणार याचा ठाणेकरांनी जाब विचारावा, असे जाहीर आवाहन ठाणे जिल्ह्यात टोलबंदीची चळवळ उभी करणाऱ्या ‘टिसा’ आणि ‘टोल विरोधी समिती’ने ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदारांना केले आहे.‘टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा’, अशा शब्दात या समितीने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ठाण्यातील नेत्यांत हिम्मत असेल तर त्यांनी तो बंद करून दाखवावाच, असे समितीने म्हटले आहे. कोल्हापूरकर टोल बंद करून दाखवू शकतात मग ठाण्यातील नेत्यांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीत टोल बंदीबाबत वचन दिल्यानंतरही ठाणे जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे टोलबंदी झालेली नाही. मुंबई-ठाणेकरांचा पिच्छा टोल सोडत नसल्याने आगामी निवडणुकीपूर्वी ‘टोल हटवा, मते मिळावा’अशी व्यापक चळवळ गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील ‘टिसा’ आणि अन्य ५५ संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. दरम्यान, त्याच आशयाचे कार स्टीकर्स, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ तीव्र करण्याचे काम केले गेले आहे.ठाणे शहराच्या प्रवेश व निर्गमननाक्यांवरील टोलनाक्यांमुळे शहरातील जनता, व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील व सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण आहे. तसेच राज्यातील इतर ठिकाणचे टोल याआधीच बंद झाले असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर वसुली अद्यापही सुरू आहे.ठाणे शहरातील नागरिकांना मुंबईतील एकही पूल न वापरता सुद्धा गेली १८ वर्षे टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इतर नाक्यांवर शहरातील ५ कि.मी.च्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या सुविधा सुद्धा इतक्या वर्षात मिळाल्या नाहीत, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)