शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर : हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:08 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईतील टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईतील टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण, नोटाबंदी व त्यानंतर आलेली जीएसटी कर प्रणाली आदींचा मोठा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदी जाहीर करून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे.पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगिक क्षेत्रात सध्या लहान-मोठे ३५00 युनिट्स कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे तीन लाख माणसे काम करीत आहेत. या क्षेत्रात एमआयडीसीने सुमारे पाच हजार व्यावसायिक युनिटसाठी जागा देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी सुमारे चार हजार उद्योग प्रत्यक्ष कार्यान्वित झाले होते. असे असले तरी महाराष्ट्र शासनाचे जाचक औद्योगिक धोरण, प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची उदासीनता आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत, तर काहींनी अन्य राज्यांत स्थलांतरित केले आहे. विशेषत: मागील दहा वर्षांत या प्रक्रियेने अधिक वेग घेतला असून या काळात जवळपास वीस टक्के उद्योग बंद करण्यात आले आहेत.काही वर्षी महापे औद्योगिक क्षेत्रातील तीस एकर जागेवर उभारलेल्या पाच बड्या कंपन्यांनी येथील आपले व्यवहार बंद करून गुजरातमध्ये स्थलांतरित केले होते. त्यापाठोपाठ अनेक लहान-मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर उद्योगांना चांगले दिवस येतील, अशी उद्योजकांची अपेक्षा होती, परंतु मागील तीन वर्षांत सरकारने जाहीर केलेले धोरण उद्योगांच्या मुळावर बसल्याने कंपन्या बंद करण्याची प्रक्रिया आणखीनच गतिमान झाल्याचे दिसून आले आहे. महापे एमआयडीसीत सुमारे ५६ एकर जागेवर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी साकारण्यात आली आहे. येथील रिलायन्स कम्युनिकेशमध्ये जवळपास पंचवीस हजार कर्मचारी काम करीत आहेत, परंतु व्यवस्थापनाने आता हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यानुसार नोकरकपात सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास तीन हजार कर्मचाºयांना नारळ दिल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित कर्मचाºयांत असुरक्षितता निर्माण झाली आहे. रिलायन्स कम्युनिकेशपाठोपाठ या क्षेत्रातील अनेक लहान-मोठ्या उद्योगांना घरघर लागली आहे. आठवड्याला सरासरी एक कारखाना बंद केला जात आहे.मागील काही महिन्यांत ही प्रक्रिया गतिमान झाल्याने हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून याचा सर्वाधिक फटका प्रकल्पग्रस्तांना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GSTजीएसटीNote Banनोटाबंदीthaneठाणे