शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर : हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:08 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईतील टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईतील टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण, नोटाबंदी व त्यानंतर आलेली जीएसटी कर प्रणाली आदींचा मोठा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदी जाहीर करून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे.पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगिक क्षेत्रात सध्या लहान-मोठे ३५00 युनिट्स कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे तीन लाख माणसे काम करीत आहेत. या क्षेत्रात एमआयडीसीने सुमारे पाच हजार व्यावसायिक युनिटसाठी जागा देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी सुमारे चार हजार उद्योग प्रत्यक्ष कार्यान्वित झाले होते. असे असले तरी महाराष्ट्र शासनाचे जाचक औद्योगिक धोरण, प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची उदासीनता आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत, तर काहींनी अन्य राज्यांत स्थलांतरित केले आहे. विशेषत: मागील दहा वर्षांत या प्रक्रियेने अधिक वेग घेतला असून या काळात जवळपास वीस टक्के उद्योग बंद करण्यात आले आहेत.काही वर्षी महापे औद्योगिक क्षेत्रातील तीस एकर जागेवर उभारलेल्या पाच बड्या कंपन्यांनी येथील आपले व्यवहार बंद करून गुजरातमध्ये स्थलांतरित केले होते. त्यापाठोपाठ अनेक लहान-मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर उद्योगांना चांगले दिवस येतील, अशी उद्योजकांची अपेक्षा होती, परंतु मागील तीन वर्षांत सरकारने जाहीर केलेले धोरण उद्योगांच्या मुळावर बसल्याने कंपन्या बंद करण्याची प्रक्रिया आणखीनच गतिमान झाल्याचे दिसून आले आहे. महापे एमआयडीसीत सुमारे ५६ एकर जागेवर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी साकारण्यात आली आहे. येथील रिलायन्स कम्युनिकेशमध्ये जवळपास पंचवीस हजार कर्मचारी काम करीत आहेत, परंतु व्यवस्थापनाने आता हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यानुसार नोकरकपात सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास तीन हजार कर्मचाºयांना नारळ दिल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित कर्मचाºयांत असुरक्षितता निर्माण झाली आहे. रिलायन्स कम्युनिकेशपाठोपाठ या क्षेत्रातील अनेक लहान-मोठ्या उद्योगांना घरघर लागली आहे. आठवड्याला सरासरी एक कारखाना बंद केला जात आहे.मागील काही महिन्यांत ही प्रक्रिया गतिमान झाल्याने हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून याचा सर्वाधिक फटका प्रकल्पग्रस्तांना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GSTजीएसटीNote Banनोटाबंदीthaneठाणे