शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

काळ नदीतील दूषित पाणीप्रश्न गंभीर

By admin | Updated: May 31, 2017 06:11 IST

काळ नदीमध्ये शहरातील मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ही नदी अत्यंत दूषित झाली असून, या नदीच्या पा

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : काळ नदीमध्ये शहरातील मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ही नदी अत्यंत दूषित झाली असून, या नदीच्या पाण्याला उग्र वास येत असल्याने ते पाणी आंघोळीला घेण्यासाठी देखील नागरिक कचरत आहेत. या दूषित पाण्याला नियमबाह्य परवानगी देणारी माणगाव नगरपंचायत हीच कारणीभूत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत कृती समितीने अधिक आक्र मक भूमिका घेताना या प्रश्नाबाबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी मुंबई येथे काँग्रेस भवनात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. हा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असून याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्र ार दाखल करा, त्यांच्याकडे मी देखील बोलून घेतो, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्ञानदेव पवार यांना सांगितले.या दूषित पाणीप्रश्नाबाबत आमदार सुनील तटकरे यांनी कृती समिती माणगाव व नगरपंचायतीच्या समवेत नगरपंचायत कार्यालयात १५ दिवसांपूर्वी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. माणगाव नगरपंचायतीकडून काही बिल्डरांवर थातूरमातूर कारवाई करून कृती समितीची समज काढण्याचा प्रयत्न केला गेला. कारवाई करताना इमारतींच्या जलवाहिन्या तोडून टाकण्यात आल्याचे व कारवाई केल्याचे कृती समितीला भासविण्यात आले. तोडलेल्या या जलवाहिन्या लगेचच दुसऱ्या दिवशी जोडण्यात आल्याने माणगावकर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही इमारतींच्या गटारांमध्ये नागरिकांचे समाधान करण्यासाठी थोडीशी माती टाकण्यात आली आहे. परंतु सद्यस्थिती पाहता अजूनही काळनदीत जाणारे गटारांचे सांडपाणी नगरपंचायतीने बंद केलेले दिसत नाही. कृती समितीला व माणगावमधील पत्रकारांना वेळ मारून नेण्यासाठी लेखी पत्राद्वारे काम करण्याचे आश्वासन देऊन आजपर्यंत केवळ दिशाभूलच केली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत कृती समिती माणगाव यांची २ जून रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून हा प्रश्न आता गंभीर रूप धारण करू लागला आहे. नुकतीच पाच दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील टेमपाले येथे दूषित पाण्यामुळे कावीळचे २३ रु ग्ण आढळून आले. आता त्याठिकाणी साथ आटोक्यात आहे. या भीषण प्रश्नाबाबत कृती समितीने आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्कृती समिती माणगावचे कार्यकर्ते ज्ञानदेव पवार, बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, सुरेश मोहिते, सलीम शेख, मजीद हाजिते आदींनी व्यक्त के ला.