शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जलवाहतुकीमुळे ट्रिपल बचत धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:30 IST

ठाणेकरांना येत्या काही महिन्यांत जलवाहतुकीची सफर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार

- अजित मांडकेठाणे : ठाणेकरांना येत्या काही महिन्यांत जलवाहतुकीची सफर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार असून, या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे-कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत - दिवा - भिवंडी - कल्याण तर दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा ‘फेज २’चा जलमार्ग आहे. डिसेंबर २०१८पर्यंत वसई - ठाणे - कल्याण या पहिल्या टप्प्यातील दोन ते तीन बोटी सुरू होतील असा विश्वासही ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावणार आहेत. या जलवाहतुकीमुळे प्रवाशांचा वेळ, इंधन आणि पैसे असा ट्रिपल बचत धमाका तर होणार आहेच, शिवाय वाहतूककोंडीच्या व्यापातूनदेखील सुटका होणार आहे.ठाणे महापालिका खाडीतून अंतर्गत जलवाहतूक सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे-कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत - दिवा - भिवंडी - कल्याण हा २५ नॉटीकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे ठाण्यापासून कल्याण, वसई, मीरा-भार्इंदर, भिवंडी या शहरांपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी होणारा सुमारे ६५० कोटींचा निधी हा संपूर्णपणे केंद्राकडून मिळणार असल्याने पालिकेवरचा याकामी पडणारा खर्चाचा ताण कमी होणार आहे. तर कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब हे विकसित केले जाणार आहे. ज्या ठिकाणी बोटी दुरुस्तदेखील केल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ८ ते १० क्षमतेच्या दोन ते तीन बोटी घेतल्या जाणार असून, त्या डिसेंबर अखेरपर्यंत धावतील असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.१० ठिकाणी उभारली जेट्टीजलवाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी ठाण्यात १० ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे. कल्याण, डोंबिवली (ठाकुर्ली गाव), अंजुरदिवे, काल्हेर, पारसिक बंदर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर गाव, मीरा-भार्इंदर आणि वसई किल्ला या ठिकाणी त्या असणार आहेत.दुसºया टप्प्याच्या कामाला होणार सुरुवातजलवाहतुकीच्या ठाणे - कल्याण - वसई या ‘फेज १’ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वता मान्यता मिळाल्यानंतर आता ‘फेज २’चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज २चा जलमार्ग आहे. दुसºया टप्प्यातील जलवाहतुकीमुळे २० टक्के रस्ते वाहतुकीचा भार हलका होणार असून, सध्या घोडबंदरहून मुंबईला जाण्यास जे दोन तास लागतात तो प्रवास १ तासाने कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.तीन स्तरांवर सुरू होणार जलवाहतूकमालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरांवर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेलादेखील यापासून चांगला महसूल मिळणार आहे. प्रवासी जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील ठाण्यात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार असल्याने पर्यटकांना ठाण्यात येण्यास वाव मिळणार आहे.रस्त्यावरील ट्राफिक होणार शिफ्ट : या वाहतुकीमुळे शहरात रस्त्यावर होणारी ट्राफिक कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या ठाण्यातील मुख्य चौक वाहनांमुळे गजबजले आहेत. त्यामुळे या वाहनांना किंबहुना खासगी वाहन चालकांना जलवाहतुकीचा पर्याय दिल्यास अंतर्गत भागात रस्त्यावर होणारी वाहतूक कमी होणार आहे. तसेच रेल्वे प्रवाशांचादेखील मोठा भार यामुळे कमी होणार आहे.ठाणे ते मुंबईचा जलमार्गठाणे (साकेत) पासून जलवाहतुकीला सुरुवात होणार असून, त्यानंतर कळवा - विटावा - मीठबंदर - ऐरोली - वाशी - ट्रॉम्बे - एलिफंटा - फेरी वार्फ - गेटवे आॅफ इंडिया.ठाणे - नवी मुंबई मार्गाला साकेतपासून सुरुवात होईल. त्यानंतर वाशी - नेरूळ - बेलापूर - तळोजा तर एक मार्ग बेलापूर हा पनवेलला जोडण्यात येणार असून, व्हाया जुईनगरला जाणार आहे. तसेच अजून एक मार्ग जेएनपीटी आणि उरणमार्गे नेरूळला जाणार आहे.