शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

जोरदार पावसाने धरणात तिप्पट साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:53 IST

तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतपर्यंत सुमारे तीन

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतपर्यंत सुमारे तीन हजार मिमी जादा पावसाची नोंद झाली असून मंगळवारी सायंकाळी ४ वाजता तानसा धरण १०० टक्के भरले, त्या आधी मोडकसागर ओसंडून वाहू लागले. आहे. तर अन्य धरणांमध्ये तिप्पट पाणीसाठा तयार झाला आहे.संततधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोड पाणी खाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबली. उल्हासनगरजवळ वालधुनी नदीच्या पुराचे काठावरील झोपड्यांमध्ये पाणी शिरले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील झाडाची फांदी तुटली, शहरात सहा झाडे उन्मळून पडले, तीन मोठे वृक्ष झुकले आहेत. एक भिंती पडली, तर नाल्यावरील कंपाऊंड वाहून गेले, एक कंपाउंड पडल्याच्या स्थितीत आहे. पाणलोट क्षेत्रासह शहरी व निवासी भागात ही पाऊस जोरदार पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १००२८ मिमी. पाऊस पडला, मागील वर्षी या दिवशी केवळ ७३८६.३० मिमी पाऊस पडला होता. यंदा सरासरी १४३२.६१ मीमी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस उल्हासनगरला १५०४ मीमी, मुरबाडला १४९३, ठाण्याला १४६९, कल्याणला १४५६, भिवंडीला १४१८, शहापूरला १४०७ तर अंबरनाथला सर्वात कमी १२८१ मीमी पाऊस झाला.शहरात मुसळधार पाऊस- २४ तासांपासून ठाण्यात सातत्याने बरसणाऱ्या पावसाचा जोर मंगळवार पहाटेपासून पुन्हा वाढला. मुसळधार पावसामुळे भिंत तसेच वृक्ष उन्मळून पडण्याच्या किरकोळ घटना शहरात घडल्या. विशेष म्हणजे, पाऊस असला तरी शहरातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु होती. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. संपूर्ण ठाणे शहरामध्ये गेल्या चोवीस तासात ११२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे चोवीस तासांत वेगवेगळ्या २१ तक्रारी आल्या. त्यात कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागातील नाल्याची भिंत तसेच नौपाड्यातील वैभव सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याच्या तक्रारींचा समावेश होता. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.