शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आदिवासींना वनक्षेत्रात आवासासाठी जमीन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:25 IST

राज्यपालांकडून अधिसूचना : पालघरमधील अनुसूचित जमाती, वननिवासींना मोठा दिलासा

बोर्डी/जव्हार : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल केले आहेत. त्यानुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मात्र पालघर जिल्ह्यात वनहक्क पट्ट्यांचा प्रश्न तीव्र स्वरूपाचा आहे. त्यावर घरे बांधल्यास वन विभागाकडून कारवाई केली जाते. त्यामुळे येथील अनुसूचित जमातींना दिलासा मिळालेला नसल्याचे मत कष्टकरी संघटनेने मांडले आहे

या अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे मूळ गावातून होणारे स्थलांतर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. ही अधिसूचना राज्यपालांनी संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील परिच्छेद ५, उपपरिच्छेद १ अंतर्गत असलेल्या प्राप्त अधिकारांचा वापर करून काढली आहे. पालघर जिल्ह्याचा समावेश अनुसूचित क्षेत्रात आहे. अनुसूचित जमाती आणि वननिवासी कुटुंबांची लोकसंख्या वाढल्यामुळे तसेच या कुटुंबाना जागा उपलब्ध नसल्याने मूळ वसतीस्थानापासून अन्य भागात स्थलांतर करतात. या जिल्ह्यातील भेटीदरम्यान राज्यपालांच्या निदर्शनास आले होते. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.दरम्यान, पालघर जिल्ह्यात वनहक्क दाव्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक पट्ट्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. वनहक्क पट्ट्यांवर घरे बांधण्याला परवानगी मिळाली नसल्याने वन विभागाकडून कारवाई केली जाते. त्यामुळे हा प्रश्न पूर्णपणे सुटला नसल्याने येथील स्थानिकांना दिलासा मिळाला नसल्याचे कष्टकरी संघटनेकडून सांगण्यात आले.या अधिसूचनेचे स्वागत आहे. मात्र काही प्रमाणात प्रश्न सुटतील. वनहक्क पट्ट्यांवर घरे बांधण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. अन्यथा वन विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.- ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर